Posts

Showing posts from June, 2023

वांगड्यानं येतयं...!!* *(मालवणी लघुकथा)*

*वांगड्यानं येतयं...!!*   *(मालवणी लघुकथा)* "रे, तेका ताप इल्लो हा. तुमका चाकरमान्यांक कितेव सांगला तरी आपला ताच खरा? तुझी बायेल मुंबईतसून इल्ली हा, पण तू हयच येद्याचो केदो झालसं मा? तरी जळतो पाय जाळतलय पण मागे घेवचय नाय ह्या कसला म रे तुजा वागणा? अवसेचो चेडवाक घेउन गेल्लस झोळवूंक! आता भायरचा काय तरी बादला मगे रे?" दिगल्याच्या आवशीनं गाळीये घालुक सुरुवात केल्यान. मगे मुंबयकरीण बायलं घाबारली. तेना पण हरीकथा लावल्यान, "अहो ममडीला बराच ताप आहे हो. हे आतलं - बाहेरचं म्हणजे काय? औषध तरी आणा" आता काय सांगुचा? ८० साल ईला पण अजून रस्त्याक लायटी येवक नाय आसत. वालावलेत कोण मेलो डॉक्टर आणि केमिष्ट? कुडाळाक जावचा लागतला. "गो बायग्या, कुडाळातसून शेणाय मास्तराच्या दुकानातसून गोळीये हाडतय." दिगलो भैणीक हाळी घालून भायर पडलो. वालावलेतसून ४ वाजतानाचो लाल डब्बो पकडून दिगलो कुडाळात इलो. मगे बांबार्डेकर डॉक्टराकडून चिठ्ठी घेऊन, शेणाय मास्तराच्या दुकानात गेलो. थय औषधा घेई होतो तेवा पबल्या मांजरेकरान धबकल्यान," रे, कधी आयलं?, बायलेक आणि चेडवाक हाडहस मा? तुजा पयलाच चेडू! माव...

लेख

वाचन संस्कृतीवर सोशल मिडियाचा प्रभाव सोशल मीडियाच्या प्रसारपूर्व काळात विसाव्या शतकात मुद्रित स्वरूपातील माध्यमांचा पगडा होता. तत्पूर्वीच्या काळात केवळ मुद्रित साहित्याचा जगभरातील सकल चळवळीवर प्रखर प्रभाव होता. साहित्य, वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट अशा क्रमाने माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलत गेले. स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर यात आमूलाग्र परिवर्तन झाले. आजकाल सोशल मीडियाचा सगळीकडे बोलबाला झालाय. याचा सर्वात जास्त परिणाम वाचन चळवळीवर झालाय.  ग्रंथालय हे वाचनसंस्कृतीचे पारंपरिक माध्यम. पण आता इंटरनेटच्या वाढत्या वापरानंतर सोशल मीडिया हा तरुणाईच्या वाचन संस्कृतीचा नवा आधार होऊ लागला आहे. एकीकडे तरुण पिढी अजिबात वाचन करत नाही हे पालुपद अनेकदा ऐकायला मिळते, तर दुसरीकडे महागडय़ा किंडल्सची वाढती विक्री, पेड इ बुक्सचा वाढता वाचकवर्ग असे तरुणाईच्या पुस्तकप्रेमाचे दाखले आपल्याला दिसतात. तरुण पिढीचा वेळ सर्वाधिक प्रमाणात मोबाइल आणि वेब सिरीज वगैरेमध्ये जात असला तरी पुस्तकात रमणाऱ्या तरुणाईची संख्याही तितकीच आहे. २४ तास सोशल मिडिया आणि इंटरनेटवर असणाऱ्या फोटो, व्हिडीओज, पोस्ट...

कथा

पारिजात सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही. माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते. दिवाळीत केला होता का शेवटचा फोन, आणि मध्ये एकदा अण्णांच्या तब्बेतीची चौकशी करायला केला होता ना? ती आठवू लागली. गेल्या दीड वर्षात तिच्या स्वतःच्याच आयुष्याची घडी इतकी विस्कटली होती की ती पुन्हा बसवताना या सार्या गोष्टी राहूनच गेल्या होत्या. त्यात माई, अण्णा हे हक्क गाजावणार्यान्पैकीही नव्हते की रुसवे फुगवे धरणार्यान्पैकी. आणि मुंबईला आईबाबांना फोन केला की त्यांची खुशाली कळतच होती की! आता मात्र नुसता फोन नाही तर माईला भेटायलाच जायचं असा तिने निश्चय केला. आज र...