मोडी लिपीचा इतिहास मोडी लिपी केव्हापासून सुरू झाली याबाबत इतिहास तज्ञांच्यात एकमत नाही. काही संशोधकांच्या मते या लिपीचा जन्म दोन हजार बर्षे इतका असावा. भारत मौर्य वंशाचे राजे चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानते जाते. मौर्याची लिपी म्हणून तिला 'मोडी' म्हटले जाऊ लागले. मोडी लिपीत अपूर्ण वर्ण काढण्याची सोय नाही. त्यामुळे संयुक्त वर्ण बालबोधीप्रमाणे मोठ्या लिपीत बिनचूक लिहिता येत नाहीत. उदा. व्य'चे लेखन 'वय ' असे आढळते. त्याकाळात अशोक लिपी होती. त्यातही ऱ्हस्व दीर्घ व्यवस्था नसल्यामुळे अशेक लिपीची सुधारित आवृत्ती म्हणजे मोडी लिपी असे मानले गेले. दुसरे मत असे की, सुमारे सातशे वर्षे दक्षिण भारतात यादवांचे साम्राज्य होते. महादेवराव यादवांच्या कारकिर्दीत हेमांडपंत किंवा हेमाद्रीपंत नामक प्रख्यात प्रधानमंत्री होऊन गेला (इ.स. १२६०) हेमांडपंताचे मराठी भाषेवर अलोट प्रेम होते. त्यांनी मराठीत बरीचशी ग्रंथरचना केली असावी, असा तर्क तज्ञांचा आहे. परंतु त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. खाजगी व राजकीय व्यवहारात लिहावयाच्या पत्राचे मायने कसे असावेत याबद्द...
३१ डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे… मागे वळून पाहताना जाणवतं—हे वर्ष केवळ दिवस-महिने नाही तर अनुभवांनी भरलेलं एक मोठं पुस्तक होतं. वर्षाच्या सुरुवातीला किती तरी संकल्प केले होते. काही पूर्ण झाले, काही अर्ध्यावर थांबले, तर काही फक्त मनातच राहिले. पण आज उमगतंय की संकल्प पूर्ण झाले की नाही, यापेक्षा त्या प्रक्रियेत आपण काय झालो—हे जास्त महत्त्वाचं आहे. या वर्षात जे जे लोक भेटले, त्यांचे मनापासून आभार. जे चांगले वागले—ज्यांनी साथ दिली, समजून घेतलं, शब्दांनी किंवा शांत उपस्थितीने आधार दिला—त्यांचे खास आभार. आणि जे तसे वागले नाहीत, ज्यांनी दुखावलं, अपेक्षा मोडल्या—त्यांचेही आभारच. कारण त्यांनी मला अधिक मजबूत केलं, स्वतःला ओळखायला शिकवलं आणि “सगळे आपले नसतात” ही वस्तुस्थिती स्वीकारायला लावली. नात्यांबाबत अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या. जुन्या मैत्रिणींना भेटायचं राहून गेलं, भावंडांकडे जाऊन मनसोक्त बोलणं राहून गेलं. वेळ होता, पण वेळ देणं राहून गेलं. याचंच थोडंसं दुःख मनात आहे… पण हेही कळलं की नाती मनात जिवंत असली, तरी त्यांना वेळ देणं किती गरजेचं आहे. नोकरीत झालेली बदली—तीही या वर्...
*किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.* ग्रंथालये आणि माहिती केंद्रे सदैवच ज्ञानाचे हृदय मानली गेली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या माहिती स्रोतांचा संग्रह, पुस्तके, जर्नल्स, ई-बुक्स, शोध सामग्री आणि सदस्यांसाठी मार्गदर्शन यांचा समावेश असतो. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ग्रंथालये केवळ पुस्तकांचे भांडार राहिलेले नाहीत, तर ती माहिती व डिजिटल संसाधनांचा संकलन केंद्र बनली आहेत. या बदलत्या वातावरणात किओस्क ही एक महत्त्वाची साधन बनली आहे. किओस्क म्हणजे एक माहिती व सेवा केंद्र जेथे सदस्यांना डिजिटल किंवा फिजिकल स्वरूपात माहिती सहज उपलब्ध होते. या केंद्राचा उपयोग केवळ माहिती शोधण्यासाठीच नाही, तर सदस्यांना स्वयंसेवा सुविधा, मार्गदर्शन, तसेच डिजिटल संसाधनांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी केला जातो. किओस्कचा हेतू हे सुनिश्चित करणे आहे की माहितीचे हक्क सर्व सदस्यांपर्यंत त्वरीत पोहोचतील आणि ग्रंथालयातील प्रक्रिया जलद, सोपी व सुचारू होईल. ग्रंथालयातील किओस्क विविध प्रकारचे असू शकतात. काही किओस्क पूर्णपणे डिजिटल स्वरूपाचे असतात, जिथे टच स्क्रीन, इंटरनेट कनेक्शन, ई-बुक्स, डेटाबेस, आणि ऑनलाईन प...
सुरेख रचना...💐💐💐
ReplyDelete