Posts

Showing posts from February, 2023

बर्म्युडा ट्रॅंगल

*बर्म्युडा ट्रँगल* रहस्यमय त्रिकोणाचा मागोवा जगामध्ये काही रहस्य अशी आहेत की त्यांचा उकल होत नाही. विज्ञानालाही त्यांचं कोडं सोडवता आलं नाही. सागरामध्ये असाच एक प्रदेश आहे बर्म्युडा ट्रँगल. ह्या भागामध्ये अनेक विमाने, जहाजे त्यातील एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांसह गायब झाली आहेत. ह्या विमानांचे अवशेष मागे सापडले नाहीत, मृत प्रवाशांचे देहही सापडले नाहीत. गायब विमान किंवा जहाजांचा शोध घेणाऱ्या मोहिमा आखल्या गेल्या. शेकडो मैल सागर पिंजून काढला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस असलेला हा सागरी प्रदेश अनेक वर्षांपासून एक गूढ बनून राहिला आहे. विजय देवधरांनी लिहिलेल्या 'बर्म्युडा ट्रँगल" पुस्तकात ह्या गूढ सागराचा वेध घेतला आहे. हा भाग सैतानाचा आहे इथपासून ते परग्रहावरील मानव इथून विमाने-जहाजे पळवतात इथपर्यंत शक्यतांची माहिती दिली आहे. मूळ लेखक चार्ल्स बार्लीज असून देवधरांनी अत्यंत सोप्या मराठी भाषेत अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचताना आपणही एका रहस्यमय जगात प्रवेश करतो. काही जहाजांवरील फक्त खलाशी गायब झाले, ते जहाज लुटण्याचा प्रयत्न झाला नाही, जहाजावरील ...

लग्न जमणे - मोठी समस्या*

*लग्न जमणे - मोठी समस्या* लग्न जमविण्याच्या विविध पध्दतीत आपण जरा इतिहासात डोकावुन पाहिले तर आपणांस असे दिसते की, पुर्वी लग्न ही जास्तीत जास्त नात्यात लावली जात. जसे आत्याच्या मुलाला भावाची मुलगी देणे, मामाला मुलगी देणे, साटेलोटे करणे, जवळपासच्या नात्यामध्ये मुलगी देणे, मुलगी जन्माला आली की लगेचच तिचे लग्न ठरविल्या जात. नामकरणाच्या पाळण्याला टिळा लावला जात. तिला माहित सुध्दा नसायचे की, तिचे लग्न होत आहे किंवा तिचा जोडीदार कोण आहे? कसा आहे? काय करतो? हे प्रश्न तिच्या मनात येण्याची संधीच तिला कधी मिळाली नाही. वयात येण्यापुर्वी किंवा वयात आल्यानंतर तिला कळायचे नवरा म्हणजे काय? यात मुलीला काही समजण्याच्या आत कोवळ्या बालपणातच तिच्यावर संसाराच्या जबाबदा-या टाकल्या जात.... अशातच एखाद्या विदुराशी, म्हाता-या माणसाशी सुध्दा लहान मुलीचे लग्न लावले जात. आणि त्यात जर तो म्हातारा नवरा मेला की हिच्या हाल अपेष्टांना येथुन सुरुवात होत. जे खेळण्याचे वय होते त्या काळात तिच्यावर असंख्य जबाबदा-यांचे रहाटगाडगे तिच्यावर सोपवुन घरातील (माहेरची) मंडळी निश्चिंत होऊन जात, एकदा का मुलीचे लग्न झाले की ते मोकळे ना....

निरोपाची वेळ

Image
निरोपाची वेळ  घराच्या अंगणातच मध्यभागी एक मंडप बांधला होता, त्यावर चकाकणारे तोरण बसवले होते.मंडपाच्या चार कोपऱ्यात सात रंगाचे पडदे लावले होते, ज्यात विविध नक्षीकाम, छोटे मोत्यांनी भरलेले होते. आणि चमकदार आरसे. च्या तुकड्यांनी सुशोभित घराच्या बाहेरील भागात रंगीबेरंगी दिव्यांचीं रोषणाई करण्यात आली होती. एवढंच समजून घ्या की अख्ख घर नवरी सारख नटल होत.  शोभाताईनां प्रियाच्या लग्नात हळद, मेंदी, संगीतापासून ते निरोपापर्यंतचा प्रत्येक सोहळा घरीच व्हायचा होता, म्हणून त्यांनी फक्त रिसेप्शनसाठी पंचतारांकित हॉटेलच बुक केले होते.  लग्नाच्या विधींची सुरुवात गीते गायनाने झाली. शोभाताई त्यांच्या देखरेखीखाली घाईघाईने सर्व कामे करून घेत होत्या. प्रियाच्या लग्नात तिला कोणत्याही प्रकारची कमतरता नको होती. कधी हळुहळु आणि जल्लोषाच्या वातावरणात शोभाचे डोळे पाणावायचे, कधी प्रिया शोभासाठी हळद-मेंदीच्या हाताने औषधं आणायची, कधी पाणी आणायची तर कधी शोभाला मिठी मारून म्हणायची- "आई. आता कर. तू सकाळपासून धावत आहेस, थोडी विश्रांती घे."  शोभाला एकदा मिठी मारून रडावे अशी प्रियाची इच्छा होती...