महत्व

वाचनाचे महत्व मुलांसाठी 

 वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून  फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.
 शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक असतात. त्यांना सुविधा आणि सुशिक्षित करण्याकडे, चांगले घडविण्याकडे त्यांचे लक्ष असते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ' वाचाल, तर वाचाल' हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'

Comments