Posts

Showing posts from May, 2022

जननायक बिरसा मुंडा

*जननायक -बिरसा मुंडा* देवाप्रमाणे पुजले जाणारे बिरसा मुंडा आहेत तरी कोण? आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात. महानायक बिरसा मुंडा  यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंडमधील लिहतु या गावी झाला. साल्गा गावातील प्राथमिक शिक्षणानंतर ते चाईबासा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेले. सुगना मुंडा आणि करमी हातू यांचे पुत्र असलेले बिरसा मुंडा यांच्या मनात सुरुवातीपासून ब्रिटिश सरकारविरोधात असंतोष होता. भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांना एक नायक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी झारखंडमध्ये क्रांतीकारी कार्य करुन आदिवासी समाजाची दिशा आणि दशा बदलून नवीन सामाजिक आणि राजनैतिक युगाचा आरंभ केला.  आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात. बिरसा यांनी मुंडा विद्रोह पारंपरिक भूव्यवस्था बदलण्यासाठी केला होता. जमीनदारांकडून आदिवासींचा होणार छळ संपवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुद्धता, आत्म-सुधार आणि एकेश्वरवादाचा उपदेश दिला. त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयाय...

जंगलाच देण

Image
जंगलाचं देणं' फोटो गुगल स्त्रोत         हा मारुती चितमपल्ली यांचा ललितलेखनाचा उत्कृष्ट नमुना असणारा कथासंग्रह नुकताच दुसऱ्यांदा वाचला. निसर्गाबद्दल इतक्या अप्रतिमपणे क्वचितच एखाद्या लेखकाने लिहिलेले असावे. एकूण २७ कथांमधून पशुपक्षी, वनस्पती व अनेक अनभिज्ञ प्रसंग यांचे हुबेहूब चित्रण आपल्या डोळ्यासमोर ते अगदी लिलया उभे करतात. अनेक विस्मयकारक प्रसंग अगदी सहजपणाने सांगून जातात. जंगलाचा अभ्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींचा अनुभव ते उदाहरणादाखल देतात. याशिवाय प्राचीन काळापासूनच संदर्भ व देश-विदेशातील साहित्यात आलेले उल्लेखही ते ओघवत्यापणाने वाचकांना उपलब्ध करून देतात. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. मात्र आपण जर त्याची हेळसांड केली तर आपल्यावर आपत्ती ओढवू शकते असा इशाराही ते वेळोवेळी देतात. आजच्या घडीला जगावर आलेले कोरोनाचे संकटही असेच मानवाने निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या गैरकृत्याचे फळ आहे असे मला वाटते. लेखकांनी हातचं न राखता हे जंगलचं देणे भरभरून दिले आहे. अंतकरणात जिव्हाळा असेल, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माल...

मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे.

Image
मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणार्‍या 'मास्तरांची सावली' आणि 'कृष्णाबाई नारायण सुर्वे' या पाच शब्दांपैकी 'नारायण सुर्वे' हे दोन शब्द वाचून हातात घेतलेले पुस्तक वाचताना कधी मी कृष्णाबाईंच्या आयुष्याच्या चक्रीवादळात अडकत गेले ते लक्षात आलेच नाही. लेखक / कवीच्या पत्नीने सांगितलेल्या आपल्या आठवणी शब्दबध्द केल्या आहेत नेहा किशोर सावंत यांनी . यात आपल्या नवर्‍याला मोठे करण्यासाठी पत्नीने केलेल्या त्यागाची कथा असा एक ढोबळ अंदाज असतो. आणि इथेच या पुस्तकाचे वेगळेपण दिसते. कृष्णाबाईंनी जसा मास्तरांच्या [नारायण सुर्वे यांचा उल्लेख पुस्तकात 'मास्तर' असा येतो] जडणघडणीत आपल्या योगदानाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी स्वतःच्या आचार-विचारात, व्यक्तिमत्त्वात होत गेलेला बदल हा केवळ मास्तरांच्या सहवासानेच आहे हे पण मान्य केले आहे. अत्यंत साध्या सरळ, जवळ जवळ बोली भाषेतच, लौकिक अर्थाने अशिक्षित असलेल्या स्त्रीने तिच्या मनात साठलेले विचार, केलेली धडपड, उपसलेले कष्ट, भोगलेलं पोरकेपण, आयुष्याच्या एका निवांत वळणावर कागदावर उतरव...

रावण- राजा राक्षसांचा"

Image
रावण- राजा राक्षसांचा"    || "डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु न: शिव: शिवम्", || 'रावण- राजा राक्षसांचा' ही श्री. शरद तांदळे लिखीत कादंबरी वाचुन झाली. लिखाणाच्या बाबतीत असं म्हणतात की, 'खरा किमयागार हा धातुचे रूपांतर सोन्यात करत नाही तर तो जगाचे रूपांतर शब्दात करतो.' काही पुस्तके वाचतेवेळी शब्दश: असा अनुभव येतो. 'रावण राजा राक्षसांचा' हे याचं उत्तम उदाहरण.       ऐन तिशीतील लेखकाचं हे पहिलंच पुस्तक पण वाचतेवेळी कुठंही वाटत नाही की हे पहिलंच असावं. लेखकाने स्वत:च्या सर्व शक्यता वापरून "रावण" नावाचा कैलास लीलया उचलला आहे, दिमाखात खांद्यावर पेलला आहे.        "रावण" या नावासोबतच मनामध्ये नकळत एक चित्र तयार होते. रामायणातील खलनायक, क्रुर, अहंकारी, दहा तोंडे असलेला राक्षसराज. शतकानुशतके ग्रंथामधुन, पुराणांमधुन, कथांमधुन आणि आजकाल टीव्ही मालिका आणि सिनेमांमधुन रावणाचे खलनायकी रूप आपल्यासमोर येत राहिले. स्वत: राम होण्याची अल्पशीही पात्रता नसताना आम्ही मात्र 'रावण' जाळत राहिलो. कदाचीत यामुळेच आज...

अभ्यासोनि प्रकटिजे

Image
अभ्यासोनि प्रकटिजे   पानसेसरांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून आणि व्यासंगातून विकसित केलेल्या बालशिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा सुबोध परिचय लेखिका आपल्याला या ग्रंथात करून देत आहे. तत्त्वज्ञान या शब्दाचा साधासुधा अर्थ- सुजाणता, सुज्ञता, विवेक याविषयींचे सम्यक ज्ञान व त्यावरील प्रेम. वैज्ञानिक पायावर आणि चिरंतन मानवी मूल्यांवर आधारलेल्या परिवर्तनशील बालशिक्षण प्रक्रियेतील सुज्ञतेविषयीच्या तत्त्वांचे सैद्धांतिक ज्ञान व त्यावरील नि:सीम प्रेम म्हणजे पानसे सरांचे ‘बालविकासकेंद्री तत्त्वज्ञान’. सरांनी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, मज्जाशास्त्र, आकलनशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, ज्ञानरचनावादी शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, इ. अनेक शास्त्रांच्या तत्त्वज्ञानांचा व्यासंग करून त्यांच्या आधारे हे बालविकासकेंद्री तत्त्वज्ञान समृद्ध केले आहे. पुस्तकाच्या वाचनाचा प्रस्ताव अपेक्षित वाचकवर्गापुढे अभ्यासपूर्वक ठेवणे, ते पुस्तक वाचणे का आणि कसे श्रेयस्कर आहे हे सांगत त्यासाठी वाचकांना उद्युक्त करणे हे प्रस्तावनेचे मुख्य प्रयोजन असते. त्यामुळे ती पुस्तकाच्या आरंभीच छापली जाते. मात्र लिहिली जाते...