Posts

Showing posts from July, 2020

कोसबाडच्या टेकडीवरून परिक्षण

*कोसबाडच्या टेकडीवरुन* *--अनुताई वाघ* (आत्मचरित्र) *ऋचा प्रकाशन* *पाचवी आवूत्ती* :-१ मार्च २००८ *किमंत*:- १६० रुपये " मनाला निराश करुन टाकणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीत अनुताईंसारख्या  कार्यकर्त्या  अशी कुठली प्रेरणा मनात जिवंत ठेवून काम करीत राहतात ते मला कळत नाही . वास्तविक त्यांच्यापुढे आपण कस्पटासारखे  आहोत असेच वाटते." या पु.ल .देशपांडे यांच्या मलपूष्ठावरील भावना वाचल्यावर आपण जिज्ञासेने  हे पुस्तक वाचू लागतो.  १९१० ते १९९२ या कालावधीमध्ये केवळ माणूस म्हणून काल व्यतीत न करता  आपल्या आजूबाजूची सूष्टी अधिक सुंदर  अधिक बलशाली कशी बनवता येईल यासाठी धडपडणार  एक व्यक्तीमत्व  म्हणजे अनुताई वाघ  आनंदाचे डोही ..आनंद तरंग  याब्रीदने अशोक चिटणीस यांनी  या पुस्तकात लिहिलेली दीर्घ प्रस्तावना  अनुताईंचा जीवनपट  अतिशय सहजपणे वाचकांच्या मनाला स्पर्श करुन जातो. वयाच्या तेराव्या वर्षी  बालविधवा झालेल्या अनुताई  यांच स्वतःच्या आयुष्याच सिंहावलोकनच म्हणाव लागेल . अनुताई आणि ताराबाई मोडक यांच गुरुशिष्याच नातेसंबधातही  प...

वाचाल तर वाचाल

         प्रत्येकाची वैचारिक पातळी ही वेगवेगळी असते. कोण पटकन कुठलिही गोष्ट मनाला पटकन लावून घेत. तर कोणी ऐकून ती गोष्ट तिथेच सोडून देत. तर काही माणस समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल मांडलेल मत हे पुर्णतः चुकीच आहे. भिन्न आहे. यावर लगेच वाद घालतात.  वाद घालण चुकीचं आहे. परंतू गप्प राहून स्विकारण हेही चुकीचचं. आपलं जर रोजच वाचनं असेल तर आपली विचार करण्याची पातळी दिवसेंदिवस बदलतं जाते. आपला समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतं जातो. नियमित थोडं का होईना वाचन करायलाच हवे. सध्या मी सावरकर वाचतेय.        आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच चरित्र वाचतो. तेव्हा त्याच्या स्वभावाचे पैलू काही काळ असेना आपल्या मनात घर करून राहतात.   खुप प्रभाव पडतो आपल्या जीवनावर त्यांचा.  पण आपण कुठल्याही पुस्तकातुन चरित्रातून किती घ्यायचे किती सोडायचे किंबहुना आत्मसात करायचे हे आपल्यावर असते. पुस्तके ही आपल्या विचारांची मनाची जडणघडण करत असतात. तारा बनारसे यांच शामिनी वाचल्यावर माझ्या मनात शुर्पनखा विषयीचा जो किल्मीश जळमट मनात होता तो  द...

भय इथले संपत नाही

*भय इथले संपत नाही* आज कोरोना नावाच्या व्हायरसने पृथ्वीवर आहाकार मांडलाय. रोज बातम्यांमध्ये या कोरोनाच्या पेशंटच्या पाॅझीटिव्ह आकडा,मृत पेशंटचा आकडा ऐकून घराबाहेर पडावे की नको ही मनःस्थिती जिथे होते. रस्त्यावर रहाणारी मुलांना मात्र या नेसर्गिक आपत्तीची कल्पना नाही की भय नाही.     तिथे मला बघून आश्चर्यच वाटले खरतरं माझ्या  शाळेच्या समोर दरवर्षी जास्त पाऊस पडल्यावर पाणी साचते.  त्यादिवशी ही असाच भरपूर पाऊस पडत होता.   शाळेच्या समोर भरपूर पाणी साचले होते. आणी त्यात ती रस्त्यावर राहणारी पाच ते सहा वयाची ही मुले नैसर्गिक विधी करत होती . त्या घाण पाण्यात डुंबत होती , पोहत होती. मला ते सर्व पाहून अंगावर शहारे आले. मनामध्ये गलबलून आलं. मी माझ्या मुलांना या चार महिन्यात माझी मुलं मोठी असूनही साधं बिल्डींगच्या खाली जाऊ दिलं नाही.  मी प्रवासातून घरी गेले की आंघोळ करून स्वच्छ होऊनच. मी घरात वावरते. सतत डोक्यात हेच विचार असतात. मी प्रवास करते. यामुळे माझ्या मुलांना त्रास तर होणार नाही ना. या मुलांकडे पाहिल्यावर सतत हाच विचार येतो. या मुलांच्या आईवडिलांना नाही का ही...

माणूस म्हणून

माणूस म्हणून माणूस म्हणून आज  माणुसकीला जाग आली माणसातीलच माणसे माणसांच्या  मदतीला धावून आली।।१।। जेव्हा जेव्हा संकट आले माणसावर या माणसातलाच माणूस धावून आला वेळेवर आणी या माणसानेच मदत केली  आणी मात केली संकटावर।।2।। २६जुलै,२६ नोव्हेंबर अशी कित्येक संकटे आली यावेळेसच माणसातली खरी माणूसकी दिसुन आली।।३।। रेल्वे टॅकमधून चालणार्‍या माणसांना  जीननावश्यक वस्तूचा पुरवठा केला होता कोणीतरी रस्त्यावर या माणसांसाठी पिण्याचे पाणीही घेऊन उभा होता।।४।। यावेळीही ही मानवता ही अस्तित्वात एकच होती जात एकमेकांच्या मदतीसाठी असंख्य सरसावले होते हात!!५।। २६/११ हल्ल्यावेळी जेव्हा  द्र्युष्ट लोकांचा झाला प्रहार पोलीसातील माणसांनीच दिला सामान्य जणांना आधार।।६।। आजही लढत आहे जेव्हा मुंबई कोरोनाशी वैद्यकीय कर्मचारी पेशंटची सेवा करताहेत इतरांना बाधा होऊ नये म्हणून पोलीस रस्यांवर रात्रभर ड्युटी करताहेत।।७।। नेहमीच असतो माणसातला माणूस जागा वेळ पडेल तेव्हा मदतीला हा सदा उभा सौ.मनिषा राजन कडव कल्याण

जाणीव

आपण आपल्या जवळच्या व्यक्तीना त्यांच दुःख पाहून आपलं ह्रदय द्रवत आणी मदत करायला जातो.    त्यांना आपल्याकडून मदत मिळेपर्यंत अशा व्यक्ती अगदी आपण त्यांचे देवदूत आहोत असे भासवत डोक्यावरच घेतात.  आणी या आनंदाच्या नादात आपण त्यांना सल्ले देतो.   इथे त्यांच मात्र सगळं चांगलं होत असतं. आपलं मात्र आपल्या घराकडे दुर्लक्ष होत असतं. कळस तर तेव्हा होतो.  जेव्हा  जेव्हा आपल्याला मदतीची गरज भासते .  आपण सदर व्यक्तीकडे मदत मागतो.   यावेळी सदर व्यक्ती सरळ सांगतात माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका.   आपण निराश होतो, तरीही आपली रग( चरबी ) कमी झालेली नसते. आपण अशा व्यक्तीला आपल्या जिवनातील एक भागच समजलेला असतो ना? थोडसं जरी त्या व्यक्तीच्या घरी खटकलं , काय झालं आपण त्यांंना सल्ले द्यायला लागतो. इथेच गंमत होते. समोरील व्यक्तीला आता आपले सल्ले नकोशे झालेले असतात.  कारण एकतर आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक नसतो. दुसर कारणं फक्त त्याच आयुष्य सुधारण्यासाठी म्हणूनचं ती व्यक्ती आपल्या जवळ आलेली असते. म्हणूनच ती आपल्याला सरळचं...

*नात*

नातं नात तुझ माझं जसं नभ आणी भूमी सुर्य मावळताना क्षितिजावर एकरूप होणारी नातंं तुझ माझ युगायुगांतरीच कधीच न भंग पावणार नेहमीच अभेद्य असणार नातं तुझ माझं नेहमीच पहिल्या पावसाच्या सरीची वाट पाहणार्‍या चातकापरी नातं तुझं माझं सुगंध पसरवणारं धुंद बेधुंद करणार त्या रातराणीपरी नातं तुझं माझं क्वचितच गवसणारं पण शाश्वत असणार शिंपल्यातल्या मोत्यापरी नात तुझं माझ सार्‍या नात्यां पलिकडचं इतरांना ते नाही समजायचं ह्रदयात ते गुंतायचं नाते तुझं माझ  त्यागातील सुख नाहि पाहील जरी मुखं पण सदा जवळी तुझ्याचं नातं तुझ माझं प्रेम धागा गुंतलेला विश्वासाने घट्ट  झाली विण याची नातं तुझ माझं चाकोरी बाहेरीलं अपेक्षां पलिकडील यात आहे फक्त विश्वास तुझा माझा सौ. मनिषा कडव  r
वृत्तपत्र सायबर क्राईम स्पर्धैसाठी पाऊस पाऊस तूझ्या माझ्या मनातला पाऊस ह्रदयाला गारवा देणारा पाऊस करपलेल्या मनाला शांत करणारा हा पाऊस दिलासा देणारा हा पाऊस आपल्या नात्याला ओलावा देणारा मनात प्रेमाचे बिज अंकुरणारा हा त्या अंकुरलेल्या बिजाचे रोप बनवणारा फुलवणारा तुझ्या माझ्या या नात्याला सिंचणारा तुला माझी न मला तुझी ओढ भासवणारा विरही मनालाही ऊबदार दिलासा देणारा तसाच थंडगार शहाराही देणारा तुझ्या माझ्या जीवनात हिरवळ आणणारा कोसळून झाल्यावर आभाळ निरभ्र करणारा हा पाऊस आल्हाददायक असा तुझ्या माझ्या नात्याला समृध्द करणारा सौ.मनिषा कडव कल्याण
*तो पडत होता* तो पडत होता का कोणास ठाऊक ग्रीष्माच्या दाहाने तप्त झालेल्या त्या धरणीला थदाह शीतल करण्यासाठी पडत होता की त्या  वाटकी त्या वाटपाहणार्‍या चकोराला आस तृप्त करण्यासाठी पडत होता पण तो पडत होता. तो पडत होता त्या धरतीच्या गर्भात पेरल्याला बिजाला अंकुरण्यासाठी पडत होत्या की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्रा त्या बळीराजासाठी पडत होता.