Posts

Showing posts from May, 2024

शुक्र चांदणी

Image
सदर *पुस्तके उलगडताना* करिता शुक्र चांदणी  ठसठशीत नायिका आणि त्यांच्या जीवनातील मूल्यसंघर्ष चितारणाऱ्या चित्तरकथा... माधवी देसाई यांच्या अकरा कथांचा समावेश शुक्रचांदणी या पुस्तकात करण्यात आला आहे. हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ठसठशीत नायिकांच्या व्यक्तिरेखा हे कथांचे वैशिष्ट्य. अधांतर या कथेची नायिका आहे एक महिला पोलीस इन्स्पेक्टर. नीलांबरी. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यातील हवालदार रावराणे यांची एकुलती एक कन्या नीलांबरी. वडिलांप्रमाणेच थोराड, धिप्पाड, काळीसावळी. ती बी.ए. झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे ठरवते. प्रशिक्षण काळात खाकी युनिफॉर्म आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची ईर्षा यांचा संचार जणू तिच्या अंगात होतो. डिस्टिंक्शन घेऊन ती ग्रुपमध्ये पहिली येते. हवालदार बापाला अस्मान ठेंगणे होते. ठाणे जिल्ह्यातील एका महिला पोलीस स्टेशनवर तिची नेमणूक होते. हाताखालच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवते. गुन्हेगारांना ती कर्दनकाळ वाटते. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढायचे काम मात्र ती असिस्टंटवर सोपवते. लग्नाचा बेत ती लांबणीवर टाकत राहते. तिचे वडील घोकत राहतात.``लेकीचं लगीन? च...

अज्ञानी बनवणारे वाचन नकोय*

*अज्ञानी बनवणारे वाचन नकोय* वाचन करणं म्हणजे विचार करण्याची सवय लावणं. त्यामुळे अर्थातच आपलं वा जगणंही समृद्ध होत जातं. सध्या वाचनसंस्कृती लयाला गेली आहे, आजचे तरुण काही वाचत नाहीत अशी एक सार्वत्रिक तक्रार आहे. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी एकूणच कालानुरूप वाचन पद्धतीमधील बदलसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. सध्या डिजिटल युग असल्याने ई-वाचनसंस्कृती रुजली आहे, असे म्हणे वावगे ठरणार नाही. तरुण पिढी वाचत नाही, ती पुस्तकांपासून लांब गेली आहे, सतत स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून असते, अशी ओरड आपण सतत ऐकत असतो. पण आताच्या काळात ती तितकीशी खरी नाही, उलट वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे, वाचनाची आवड जोपासणारे आणि वाढवणारे कितीतरी जण एकत्र येऊन वेगवेगळे प्रयोग करीत असतात. आताची वाचन संस्कृती बऱ्यापैकी स्टायलिश आणि पर्सनलाइज्ड झाली आहे. किंडलने छापील पुस्तकांचे वाचन आणि डिजिटल वाचन याचा बऱ्यापैकी सुवर्णमध्य साधला आहे. आजकाल फेसबुकवर पुस्तकप्रेमी, पुस्तक मित्र असे वाचनप्रेमींचे अनेक ग्रुप्स आहेत, त्यावर एकमेकांना चांगली पुस्तके सुचवली जातात. त्यांचं परीक्षण शेअर केलं जातं, त्यावर चर्चा झडतात. बुक एक्स्चेंज ...

मराठीचा अभिमान आणि व्यावहारिक ओढाताण

मराठीचा अभिमान आणि व्यावहारिक ओढाताण भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. तर तो सर्वात मोठा आधार असतो. आज मराठी राजभाषा गौरव दिनाच्यानिमित्ताने राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होतील. मराठी भाषेच्या संवर्धनाकरीता घोषणा होतील. आणाभाकाही घेतल्या जातील. ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन म्हणूनही साजरा होतो. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. त्या मायमराठीवर अविरत प्रेमवर्षाव करण्याकरीता मराठी मन नेहमीच उत्सुक असते. त्याला काही उपक्रमांची जोड दिली तर त्या उत्साहात थोडी भर पडते. हा दिवस साजरा करण्यामागचा खरे तर प्रमुख उद्देश हाच आहे की मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. ती टिकली पाहिजे. यात काही शंका नाही. परंतु त्याच्या पुढचा टप्पा संवर्धनाचा असतो. संवर्धनामध्ये अधिक श्रम, अधिक आत्मियता, किंबहुना अधिक शाश्वतताही असते. म्हणूनच मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करीत असताना तिच्या संवर्धनाचे काय असा प्रश्न नकळतपणे उभा राहातो. खरे तर साहित्य संमेलन किंवा वेगळ्या अशा मातृदिनाच्या निमित्तानेसुध्दा हा विषय चर्चेला येत असतो. ज्यामध्ये मराठीला अभिजात भाषे...

शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन*

सदर - *पुस्तके उलगडताना* करिता *शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन* शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात सुधा रिसबूड यांनी फिजिक्सचे नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाईमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. फाईनमन यांचे केवळ चरित्र नाही, तर फाईनमन ही व्य्ती म्हणजे काय रसायन होतं, हे या पुस्तकातील प्रसंगावरून कळून येतं. या पुस्तकातील एकूण २५ प्रकरणातून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग यात शब्दबद्ध करण्यात आले आहेत. ‘रिचर्ड फाईनमन एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व’ या प्रकरणात फाईनमनच्या विज्ञानविषयक कर्तृत्वाचा वेध घेण्यात आला आहे. त्यांना जीवनाबद्दल विलक्षण ओढ होती. नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास होता. बुद्धीनं अत्यंत तल्लख, दांडगी विचारशक्ती, तर्कशुद्धता, गणिताची आणि फिजिक्सची मनातली घट्ट बैठक यामुळे फाईनमन हे द्रष्टे होते. आजचे युग हे नॅनो टेक्नॉलॉजीचे आहे. या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. संगणक्षेत्र, जैविकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी उपयोगी पडू शकते हे फाईनमन यांनी १९५९सालीचे सांगितले होते...

हिंदवी स्वराज्याचा ईश्वरी हुंकार - छत्रपती शिवराय*

*हिंदवी स्वराज्याचा ईश्वरी हुंकार - छत्रपती शिवराय* हिंदुस्थानच्या पुण्यभूमीचं स्वामित्व आपल्याकडे घेऊन मोगलांनी या देशातील संस्कृतीचाही उच्छाद मांडला. जेव्हा या जुलुमाचा कळस होऊ लागला त्यावेळेला या पुण्यभूमीचे अत्यंत पावित्र्याने पूजन करणाऱ्या भूमीतले ईश्वरी अधिष्ठानही जागे झाले आणि एका अद्भुत स्वराज्य हुंकाराचा ओंकारध्वनी त्रिखंडामध्ये दुमदुमला, तो ध्वनी म्हणजेच ईश्वरी अधिष्ठानातून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे अवताररूप होय. आज महाराष्ट्रासह देशभर महाराजांची जयंती मोठ्या अभिमानाने आणि आदराने साजरी होते आहे. हिंदुस्थान म्हणून भारताची जी काही आज ओळख टिकून आहे त्याचे सर्व श्रेय महाराष्ट्रातल्या या शिवाजी नावाच्या एका दुर्दम्य हुंकारामध्ये दडलेले आहे. डोळ्यादेखत आपल्याच प्रजेवर चालणारे जुलूम शिवाजी महाराजांनी पाहिले होते. माता जिजाऊंनी याच गुलामीच्या विरोधात द्वेष वारंवार व्यक्त केला होता. आणि आपल्यापोटी असाच एखादा अवतार जन्माला यावा ज्यातून केवळ ही गुलामी नष्ट व्हावी असे नव्हे तर हिंदू धर्माचा अर्थातच हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकवावा. आपल्याच प्रजेविषयीची अत्यंतिक तळमळ ...

फेरा

Image
सदर -  *पुस्तके उलगडताना* फेरा  उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका ह...

बाराशिंग्याचे जंगल

Image
'कान्हा': बाराशिंग्याचे जंगल पुस्तकाची सुरुवातच एका थरारक, विस्मयकारक आणि जादूभरल्या संध्याकाळने होते. कान्हाच्या जंगलात लेखक जिप्सीने सहजच भटकंती करत असताना मैनहर नाल्याजवळ केवळ नशिबानेच, एका अत्यंत नाट्यमय शिकारीचे ते साक्षीदार झाले.   अगदी अचानकपणे तिथे एक वाघीण अवतरली. ती इतक्या शांतपणे तिथे विहरत होती की तेथील आजुबाजूच्या प्राण्यांना जणू संदेश देत होती की आपण शिकारीच्या मूडमध्ये नाहीच आहोत ! आणि एका बेसावध क्षणी, अगदी नाट्यमयरित्या तिने केलेल्या एका चितळ-मादीची शिकार पहाण्याचं अहोभाग्य लेखक व त्यांच्या सोबत्यांना लाभलं. इतकंच नाही तर ती वाघीण ती शिकार तोंडात धरून, दूरवर चालत जाऊन, आपल्या लपवून ठेवलेल्या बछड्यांपर्यंत पोहोचते. तिने हाकारताच तिची तीन गोजिरवाणी पिल्लं पहायला मिळाल्याने तेथील उपस्थित अगदी हरखून जातात. लेखक ही सर्व घटना आपल्या चित्रवेधी शैलीने आपल्या डोळ्यांसमोर अशी काही उभी करतो जणू काही आपण तिथे उपस्थितच आहोत आणि आत्ता आपल्या डोळ्यांसमोर हे सगळं घडतंय. अशी जबरदस्त शैली आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत! आपण पुस्तक संपवून खाली ठेवेपर्यंत कान्...