Posts

Showing posts from June, 2021

नमस्कार.🙏🏻

नमस्कार.🙏🏻 प्रभाते करदर्शनम! म्हणत दिवसाची सुरुवात करताना आपल्या दोन हाताची ओंजळ समर्पण शिकवते त्या त्या दिवसाला समृद्ध करत सगळ्या च ऋण आदरभावाने मानत जोडले जातात हात आणि होतो नमस्कार ....!! नमस्कार या शब्दाचा जन्म संस्कृत शब्द नमस्कारातून झाला आहे, ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे आभार मानणे आहे., एका आत्मा ने दुसऱ्या आत्म्याला  केलेले अभिवादन ...म्हणजे नमस्कार ....!! जसे एखाद्याची  समाजमाध्यमांवर पोस्ट आपल्याला आवडली तर आपण आपल्या भावना नकळत पोहचवत आदर व्यक्त करतो..मनापासून त्या व्यक्तीप्रतीचा आदरभाव हा देखील एक मनस्वी नमस्कारच...व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जातो इतकेच भावना समान....तो ही नमस्कार उर्जेचे स्थानांतरणच....एकमेकांना दिलेले चैतन्य आँक्सिजनच....!! आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल्या आत्मभावाचे समर्पणही त्यात असते. त्यात नम्रता असते, . दुसऱ्याचा आदर, स्वीकार आणि स्वतःचं समर्पण, नम्रता .! ही सगळी ...

वाचू आनंदे " भाग - १ ते ४

Image
" वाचू आनंदे " भाग - १ ते ४ "वाचू आनंदे" ही चार पुस्तकांची पुस्तकमाला आहे. माधुरी पुरंदरे आणि नंदिता वागळे यांनी अतिशय परिश्रम करून या चार भागांची निर्मिती केल्याचे वाचताना वारंवार जाणवत रहाते.  रूढ पुस्तकांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची, आणि वाचनीय बरोबरच अतिशय प्रेक्षणीय अशी ही पुस्तके हातात घेतल्यावर खिळवून ठेवतातच.  मराठीतील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध जुन्या नव्या लेखक, कवींच्या उत्तमोत्तम कलाकृतींमधील काही भागांचे संकलन- असे यांचे सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल.  पण हे एवढेच नाही. पुस्तकांचे देखणेपण वाढवणारी आणखी एक गोष्ट, म्हणजे त्यातील फोटो, आणि चित्रे. भारतातील अनेक प्रांतांमधील शिल्पांचे, तैलरंग, जलरंगांतील चित्रांचे, लोकचित्रकलेचे, असे चोखंदळपणे निवडलेले अनेक फोटो रसिकमनाची तृप्ती करतात. योग्य त्या जागी विषयानुरूप केलेली त्यांची योजना साहित्याची रुचीही वाढवते. आपल्याकडे कलांचा केवढा समृद्ध वारसा आहे, हे जाणवून मन थक्क होते. (आणि हे सर्व फोटो रंगीत असते तर - - असेही वाटत रहाते.) चारपैकी दोन भाग कुमारांसाठी, आणि दोन बालवाचकांसाठी, असे म्हटले असले, तरी...

व्यक्ती आणि वल्ली.

Image
व्यक्ती आणि वल्ली. वाचनाची आवड असलेला पण हे पुस्तक न वाचलेला मराठी माणूस शोधुन सापडणार नाही . पु. ल. म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो अखंड वाहणारा निर्मल हास्याचा निर्झर. त्यांच्या विनोदी कथांनी लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावलंय. जर एखाद्या लेखकाला त्याची शिकवण लोकांपर्यंत पोहचवायची असेल तर त्याला त्याच साहित्य ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्यकथा, कविता, विनोद अशा प्रकारच्या साच्यात बसवायची गरजच पडत नाही मुळात. एक यशस्वी लेखक तोच असतो जो कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत असतो. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्लीनी देखील असच वेड लावलं  त्यात फक्त विनोद नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला दिलेली शिकवण आहे, सामान्य व्यक्ती तर आपण सगळेच असतो, पण आपल्यातही काही माणसं अशी असतात जी कळत-नकळत आपल्याला बरच काही शिकवून जातात. जीवनाचे धडे देतात, नि अशाच व्यक्ती त्यांच्या वेगळेपणामुळे "वल्ली" म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही वल्लींची शिकवण मी आज आपल्यासमोर मांडतेय. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाची हि शिकवणमाला म्हणजे या पुस्तकाचा...

झाडाझडती

Image
झाडाझडती तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ही कलाकृती प्रखर वास्तव समोर आणते. धरण होण्याच्या घटनेभोवती फिरणाऱ्या आयुष्याची, क्रियाप्रतिक्रियांची ही व्यापक कहाणी आहे. दहा-पंधरा वर्षांच्या काळातील, प्रदेशातील आणि मानवी जीवनातील बदल कादंबरीत टिपले आहेत. धरण, धरणग्रस्त, समाज, संघटना, राजकारण आदींचा वेध कादंबरीने घेतला आहे. धरण बांधले जाते, तेव्हा गाव विखरून जाते. गावात राहणारी माणसं विस्थापित होतात. तेव्हा त्यांचे काय होते, त्यांची मानसिक अवस्था कशी असते, पुनर्वसनातही राजकारण कसे येते, आणि या सगळ्या माणसाचे जगणे कसे येते स्वस्त होऊन ...

संस्कृतीच्या पाऊलखुणा

Image
संस्कृतीच्या पाऊलखुणा  संस्कृतीच्या पाऊलखुणा - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अत्यंत सुंदर आणि रसाळ मेवा आहे हे पुस्तक.. लेखक डॉ. द. ता. भोसले यांची लेखनशैली इतकी विलक्षण ओघवती आहे की वाचताना एक क्षणदेखील कंटाळा येत नाही.. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रा. चिं. ढेरे यांची प्रस्तावना तर अवश्य वाचायला हवी आणि डॉ. भोसले यांचे मनोगत देखील.  आपली लोकसंस्कृती ही फक्त यात्रा उत्सवा पुरती मर्यादित नाही,वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाच्या निमित्ताने, प्रथा परंपरा म्हणून ती जपली जात असली तरी आजच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात त्या संस्कृती ची रुपं ही अंधुक होत चालली आहेत त्यामुळे जून्या प्रथा परंपरांची माहिती लिहून ठेवणं गरजेचं झालं आहे.    अशीच बरीचशी रंजक माहिती लोकसाहित्याच्या पाऊलखुणा या पुस्तक रुपात लोकसाहित्याचे अभ्यासक द.ता.भोसले यांनी संकलित केली आहे. या पुस्तकात दिवाळीची कृषिसंस्कृतीचा सण म्हणून जशी ओळख करुन दिली आहे तशीच हादगा, जोगती- जोगीण, चिंध्यादेवीची उपासना , नवस इ. अशा स्वरुपाच्या परंपरेची माहिती दिली आहे, तसेच आपल्याला आजही धकाधकीच्या जगण्यात कधीतरीच...

हाती ज्यांच्या शून्य होते’

Image
‘हाती ज्यांच्या शून्य होते’ सामान्य अन् असामान्य! फरक काय तो केवळ एका अक्षराचा. मात्र हाच फरक माणसाचं कर्तृत्व अधोरेखित करतो. त्याच्यातल्या कर्तबगारीचं दर्शन घडवितो. त्यामुळं सामान्य म्हणून जन्माला आलेल्या अन् स्वतःच्या सामर्थ्यावर असामान्य ठरलेल्या व्यक्तींच्या प्रवासाचं सर्वांनाच कुतूहल वाटत असतं. त्यांच्या वाटचालीविषयी ओैत्सुक्य असतं. अरुण शेवते यांचं ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ हे पुस्तक अशाच कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वांची कहाणी. बहुतेक शाळा-महाविद्यालयांत, ग्रंथालयांत हे पुस्तक अगदी हमखास पहावयास मिळतं. यावरून त्याचं मोल ध्यानात येतं. अरुण शेवते हे ख्यातनाम साहित्यिक आहेत. मात्र त्यापलीकडं जात दिवाळी अंकाशी त्यांनी जोडलेलं नातं अगदीच खास ठरावं. हे सारे दिवाळी अंक पुढं पुस्तक रुपानं वाचकांसाठी पर्वणी ठरले अाहेत. प्रत्येक दिवाळीत एक थीम घेऊन त्यांचा अंक येतो. त्यातून लता मंगेशकर ते गुलजार, सुशीलकुमार शिंदे ते यशवंतराव गडाख, रंगनाथ पठारे ते अरुण साधू अशा जवळपास 500 हून अधिक प्रतिभावंतांना त्यांनी लिहितं बनवलं. इतकंच नव्हे, तर अमृता प्रीतम, झाकीर हुसेन, जावेद अख्तर, हरिप्र...

आय डेअर

Image
आय डेअर एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. किरण बेदी यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कामाची नेहमी नवीन क्षेत्रं स्विकारण्याची हिंमत दाखवली. पोलिसांनी केवळ गुन्हा शोधून काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि सुधारणांना सर्वाधिक महत्त्व द्यवे, या आपल्या मताचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमधील तसेच त्याबाहेरच्याही अनेक मोठमोठ्या प्रस्थांना त्यांनी हादरा दिला. आपल्या कामाला विशाल आणि व्यापक परिमाण देण्याची किरण बेदी यांची वृत्ती सत्तेवरील लोकांनाही दिसून आलेली होती. डॉ. किरण बेदी यांची अभिनव कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वाद-वादळे यांमुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना सतत केंद्रस्थानी ठेवले. हे त्यांना त्यांच्या कामातील पारदर्शकतेचे मूल्यमापन वाटते, तर इतर काही जणांना मात्र तो प्रसिद्धीच्या हव्यास वाटतो. सामान्य जनतेला मात्र किरण बेदी `मसिहा` वाटतात. देशात तसेच परदेशातही अनेकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला आहे.तथापी नाण्याची दुसरी बाजू म्‌हणून बघता, एखाद्याला असेही वाटू शकेल की त्यांच्याबद्दल प्रसृत झालेल्या त्यांच्या मूळच्याच आत्मप्रेमी प्रवृत्त...

समिधा

Image
समिधा समिधा हे आत्मकथा या प्रकारातील पुस्तक आहे.समाजसेवेतील हिमालय असणाऱ्या बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.बाबा आमटे यांनी आपले जीवन कुष्ठरोगींच्या सेवेला अर्पण केले.त्यासोबतच लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा (प्रकाश आमटे) याचीही मुहुर्तमेढ रोवली.  भारत जोडो अभियान ,नर्मदा बचाव अभियान ,निराधार ,अनाथ ,दिव्यांगाच्या सेवेत बाबांचे कार्य खूप थोर आहे शिवाय बाबांवर खूप लिखानही झालेले आहे.समिधा या ग्रंथात आमटे कुटुंबिय व समाजसेवेचा त्यांनी मांडलेला पट उलगडून दाखविलेला आहे.साधनाताईंचे बाबांच्या आयुष्यात आल्यानंतरचे आयुष्य व पूर्वीचे आयुष्य सांगताना त्यांनी बाबांची कृतार्थ गाथा मांडलीच शिवाय स्व मेहनतीचा संघर्षमय इतिहाससुद्धा मांडला आहे. समिधा या ग्रंथाचे नावच मला खूप आवडले.समिधा या शब्दाचा अर्थ होतो हवनासाठी यज्ञात टाकावयची पवित्र काडी.या काड्या वड ,पिंपळ ,पळस ,आंबा अशा पवित्र वृक्षांच्या असत.यज्ञकुंड धगधगता ठेवण्यासाठी समिधा आवश्यकच असते. बाबांनी समाजसेवेचा यज्ञकुंड मांडलेला होता.हा यज्ञकुंड तेवता ठेवण्यासाठी बाबांसह कुटुंबातला प्रत्येकजण समिधा झाल...

मन में है विश्वास"

Image
मन में है विश्वास" एखादे छान पुस्तक वाचून हा वेळ सत्कारणी लावण्याचे  मी ठरवले."मन में हैं विश्वास" या पुस्तकाने मला खुणावले आणि मुखपृष्ठावर असलेल्या ऐटबाज,धडाडीचे पोलिस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांनी विश्वास दिला कि हे पुस्तक वाच आणि वेळ सत्कारणी लाव.खरेच राजहंस प्रकाशन चे हे पुस्तक वाचकाला झपाटून टाकते,खिळवून ठेवते.श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या जडणघडणीचा प्रवास अत्यंत वाचनीय आणि प्रेरक आहे.लहानपणी शाळेत दादागिरी करण्यापासून उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून कामगिरी करण्यापर्यंत ची ही कहाणी वाचावी अशीच आहे.हे पुस्तक वाचताना एक बाब स्पष्ट पणाने लक्षात येते की प्राथमिक शिक्षण जर चांगले मिळाले किंवा शिक्षक अभ्यासू कठोर शिस्तीचे असतील तर भरकटलेल्या विद्यार्थ्याला योग्य मार्ग सापडू शकतो.विश्वासराव पाटील यांनी त्यांच्या बाबतीत शालेय जीवनात घडलेले असे काही प्रसंग यात सांगितले आहेत,ज्यातून त्यांच्या शिक्षकांनी कानउघाडणी करून त्यांना सावरले.विना तिकीट टुरिंग टॉकीज मधे घुसणे,हॉटेल मधे चहा नाश्ता करून बिल न देणे,हॉटेल मालकाशी भांडण करणे,गावात भावकी  बरोबर भांडण...

तोत्तोचान - सर्जनशील खिडकी.

Image
तोत्तोचान - सर्जनशील खिडकी. या शाळेच आयुष्य अवघ आठ वर्ष मात्र आज ऐंशी वर्षांनंतरही या शाळेच आकर्षण कायम आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला ही शाळा हवीहवीशी वाटते, आपल्याला का मिळाली नाही अशी शाळा अशी खंत वाटणे हेच कोबायाशींच्या शिक्षणपद्धतीचे यश आहे. ते स्वतः या शाळेचे मुख्याध्यापक असल्याने या शाळेत राबविलेला प्रत्येक उपक्रम विद्यार्थ्यांच बाल मानसशास्र आणि वय विचार करूच केलेला आहे. सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात यावर त्यांचा विश्वास आहे. मुलांमध्ये “चांगुलपणा” ची रुजुवात करणे आणि तो वाढताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहणे हा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळेची निर्मिती केली. या पुस्तकाच्या लेखिका तेत्सुको कुरोयानागी ह्या याच शाळेत शिकल्या. जे घडलय ते त्यांनी लिहिलं आहे. यात कोणताही कृत्रिमपणा जाणवत नाही. पुस्तक प्रकाशानंतर पहिल्या वर्षात पस्तीस लाख प्रती खपल्या. पुढच्या तीन वर्षात तो आकडा साठ लाखावर जावून जपान मधील बेस्ट सेलर पुस्तक होण यातच या पुस्तकच महत्व अधोरेखित होत. जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आणि जगाच्या काना-कोपऱ्यात हे पुस्तक पोहचलेल हे पुस्तक म...

मुसाफिर , एक प्रेरणादायीच नव्हे तर मनोरंजक नी ज्ञानवर्धक आत्मकथा.

Image
'मुसाफिर , एक प्रेरणादायीच नव्हे तर मनोरंजक नी ज्ञानवर्धक आत्मकथा.                    सध्याच्या काळात आजुबाजुची परिस्थिती पाहिली कि अच्युत गोडबोलेंच्या प्रेरणादायी आयुष्याची आठवण होते! सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तिचे मनोबल खचलेले आहे . कोरोनाचा भस्मासुर आपल्या शरीरावर कधी ताबा मिळवेल काहीच सांगता येत नाही . अनेकांचे उद्योग बंद पडले . कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या . आर्थिक घडी विस्कळीत झाली . या आजारातुन आपण वाचलोच तर पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा आहे! अशा काळात गरज असते मनोबलाची आणि मनोबल वाढण्यासाठी गरज असते प्रेरणेची! या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने अच्युत गोडबोलेंकडून प्रेरणा घ्यावी!       'मुसाफिर' हे माझं सर्वात आवडतं पुस्तक! तशी गोडबोले सरांची सर्वच पुस्तकं अभिरुचीसंपन्न , वाचनीय आणि नितांतसुंदर आहेत यात शंकाच नाही . 'किमयागार', 'मनात', 'गणिती', 'नादवेध' ही पुस्तकं काही एका रात्रीत तयार झाली नाहीत . या पुस्तकांमागे लेखकाची म्हणजेच अच्युत गोडबोले यांची दीर्घ तपश्चर्या आहे . म्हणूनच आप...

आकाशाशी जडले नाते

Image
आकाशाशी जडले नाते सूर्य का चकाकतो? तारे का लुकलुकतात? ग्रह आडवे तिडवे का फिरतात? ग्रहणे का लागतात? अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैद्धांतिक चौकट पुरवते विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणार्‍या अद्भुत, थरारक गोष्टी - कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार... खूप काही दडलेले आहे या आकाशाच्या गूढगर्भामध्ये! 'आकाशाशी जडले नाते' घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणी पर्यंत..., आर्यभटापासून आईन्स्टाईनपर्यंत..., सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर. हे पुस्तक आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करेल एवढं मात्र नक्की ! मराठीतील खगोलशास्त्रावरील सर्वात देखणे आणि माहितीपूर्ण पुस्तक म्हणून डॉ. जयंत नारळीकर सरांच्या "आकाशाशी जडले नाते" या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. खगोलशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना कमीत कमी गणित वापरून अत्यंत सोप्या भाषेत नारळीकर...

वाटेवरल्या सावल्या

Image
वाटेवरल्या सावल्या 'वाटेवरल्या सावल्या' वाचायच्या आधीच व्यंकटेश माडगूळकर यांचे 'करुणाष्टक' वाचलं होतं त्यामुळे गदिमांचे आई वडील, भावंडे, घरातील खडतर परिस्थिती त्यांचे बालपण याबद्दल माहिती होती, तरीही कविवर्यांच्या लेखणीतून त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची उत्सुकता होती. गदिमांची गीते आणि त्यांची प्रतिभा यांची जादू आज जे चाळीशीच्या पुढे आहेत, त्यांना नव्याने सांगायची गरज नाही. गदिमांच्या कथा व पटकथा असलेले मराठी मातीतले चित्रपटही भरपूर प्रसिद्ध आहेत परंतु यांच्या गद्य लेखनाबद्दल थोडी उत्सुकता होती. आत्मचरित्र लिहावे, अशा वयात त्यांनी हे लेखन केलेले नाही. जेमतेम ३८ ते ४० वयाच्या आसपास लिहिलेल्या या आठवणी आहेत. पहिले प्रदीर्घ प्रकरण हे त्यांच्या बालपणातील कष्टाचा आणि अभावाचा काळ दाखवते.  त्यानंतरची प्रकरणे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, हातात काहीही नसताना केवळ जिद्द, आणि आत्मविश्वास यांच्या बळावर शून्यातून साकार झालेल्या यशाची कहाणी आहे. या अवघड काळात ज्यांच्या आधारामुळे त्यांना पुढची पावले टाकता आली, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. पुस्तकाच्या शीर्षकात त्यांनी...

पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची.*

Image
*पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची.* मुल जन्माला आल्यापासून आठ वर्षाचे होईपर्यंत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कशी होते याबद्दल विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक आहे. बाळ लहान असल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो.  पहिली एकत्र कुटुंबात मुलं कशी मोठी व्हायची लक्षातही यायचे नाही... परंतु आज त्रिकोणी,चौकोनी कुटुंबात मुलांना वाढवणे म्हणजे अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नवं पालकांना मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मुल (मुलगा किंवा मुलगी या अर्थाने) जन्माच्या पूर्वतयारीपासून ते मुलाचा जन्म, त्याचे/ तिचे रांगणे, उभे राहणे, अडखळणे, चालणे, पळणे, बोलणे, चिडणे, रागावणे, रडणे, हट्ट करणे, खोड्या करणे, मोठ्यांचे अनुकरण करणे इत्यादी मुलाच्या वर्तणुकीचे सूक्ष्म निरीक्षण व आपल्या पीएचडी संशोधनात केलेला लहान मुलांचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय अभ्यास डॉ. श्रुती पानसेंनी सर्व पालक, शिक्षक, समाज, शासन यांना पुस्तकरूपाने उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही नवपालकांनी, शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे व कसे...

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

Image
जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात ग्रामीण आणि शहरी संस्कृती बरोबरच कृषी संस्कृतीचा परिचय करून देत जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता कवी अ. म. पठाण यांनी आईचा हात या बालकुमार कविता संग्रहात लिहिलेली आहे. कवी अ. म. पठाण हे पैठण तालुक्यातील लोहगाव येथील असून व्यवसायाने ते शिक्षक आहेत. जिव्हाळा, वाजंत्री, अनाथ, मला शाळंत जायचं, पाणपोई, आईचा हात, हे कवितासंग्रह. गोदाकाठचे गावकुस हे ललित संग्रह. तर झुमरी, पाणक्या हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आईवडिलांचा सन्मान तर गुरुजनांचा आदर कसा करावा ? शेती, माती आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून आपुलकीचे नाते कसे निर्माण करावे ? हे बालकुमारांना कवी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दगडाला देव समजून पुजा करण्यापेक्षा माणसांने माणसात देव शोधावा. गाडगेबाबांचे विचार जसे आहेत तेच विचार आपल्या कवितेतून उभा करतो आहे. आईचा हात म्हणजे संकटकाळी पाठीवरती धीर देणारी सावली आहे. आईचा हात म्हणजे ममतेचा झरा आणि माणूसकीचा धर्म आहे. आईचा हात शिकवी भक्ती दुःख निवारण्या देई सदा शक्ती आईचा हात राबे दिनरात अंधाराला दूर करी समईची वात कवी गुरु...

इस्राएल: छळाकडून बळाकडे'.

Image
...'इस्राएल: छळाकडून बळाकडे'. हजारो वर्षे निर्वासितांचे जीवन जगले.जगभर वणवण भटकत राहिले. करोडो बांधवांचा नरसंहार पाहण्याचे दुर्भाग्य त्यांना लाभले... तरीही ते भक्कमपणे उभे राहिले. लढले, जिंकले. जगातील श्रीमंत आणि बुद्धिमान लोक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली, ते लोक म्हणजे "ज्यू"! त्यांच्या यशाचे मर्म त्यांच्या शिक्षणात आहे! त्यांच्या संस्कारात आहे! त्यांच्या इतिहासात आहे! "मनुष्य केवळ आळसाने मरतो. मरण टाळायचे असेल, सुखाने जगायचे असेल तर त्याने सतत काम केले पाहिजे. पण जो कामच करत नाही त्याला जेवायचा अधिकार नाही. जेंव्हा तू स्वतःच्या श्रमाच्या भरवशावर जेवतोस तेंव्हाच तू सुखी होतोस नि त्यातच तुझे पुढे हित आहे....... दोन देशांना जोडणारे रस्ते, लोहमार्ग यांच्याविषयी तर आपण ऐकले, पाहिले असेल. पण दोन देशांना जोडणाऱ्या पुस्तकाची माहिती आहे का? ते हेच पुस्तक ज्या पुस्तकामुळे इस्रायली लोकांमध्ये या लेखकाविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी त्यांच्या देशात या लेखकाच्या नावाने एक चौक आणि एक रस्ता सुशोभित केला. त्या लेखकाचा नागरी सत्कार योजिला.अर्थात लेखक तो ...

बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक

Image
बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्‍या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्‍याने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरते. डॅा. सुखदेव एकल भाषाविकास संशोधन संस्था, कोल्‍हापूर या संस्थेने ‘बोलीविज्ञान’ हे औदुंबर सरवदे यांचे अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित केले. बोलीविज्ञानाची अध्ययनशाखा ही एकोणिसाव्‍या शतकाच्‍या उत्तरार्धात अस्‍तित्‍वात आली. भौगोलिक सीमारेषांच्‍या आधारे भाषाभेदांचा आधारे अभ्यास करणे हे या शाखेचे मुख्य उद्दिष्ट असलेले दिसते. आज जगभरामध्ये होत असलेल्‍या बोलीअभ्यासामुळे या शाखेचे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्‍या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्‍याने हे ...

"द अल्केमिस्ट

Image
"द अल्केमिस्ट" मला वाटतं, जवळपास प्रत्येकानेच हे पुस्तक वाचलेलं असावं. मुळ लेखकाने लिहीलेलं पुस्तक आणि अनुवादित पुस्तक यामध्ये खुप फरक असतो, कारण मुळ पुस्तक लिहीताना लेखकाने सर्वस्व, त्याचं सर्वोत्तम मांडलेलं असतं तर अनुवाद किंवा भाषांतर करताना लेखकाला जसे आकलन होईल त्यानुसार मांडलेलं असतं. पण हे "द अल्केमिस्ट" (किमयागार) याला अपवाद आहे, कारण ज्या मुळ भाषेत (पोर्तुगिज) हे लिहीलं आणि ज्या ७० हुन अधिक भाषेत अनुवादित झाले त्या सर्व भाषेत हे पुस्तक सारखेच समजते. खरंतर या पुस्तकाचा गाभाच आहे की- "सर्वांना समजणारी विश्वाची एक भाषा आहे, एक अशी भाषा जिला कोणतेही शब्द नाहीत, कसलाही उच्चार नसलेली भाषा-प्रेमाची भाषा."      पाउलो कोएलो या लेखकाने लिहिलेली ही कादंबरी पानांमध्ये मोजली तर खुप छोटी आहे, पक्का वाचक ही एका दिवसात वाचुन मोकळा होतो. पण जिथे शेवटचं पान बंद होईल तिथुन पुढे ही कादंबरी वाचकाचा पिच्छा सोडत नाही.  अॅन्डालुसिया इथल्या सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेन मधल्या त्याच्या जन्मभूमी पासून इजिप्तच्या वाळवंटापर्यतचा त्याचा हा प्...

कोंडुरा

Image
कोंडुरा  चिं.त्र्यं.‌खानोलकर  यांची 'कोंडुरा'  छोटेखानी कादंबरी आहे. आयुष्याला वैतागलेला एक ज्येष्ठ माणूस घर सोडून बाहेर पडतो. त्याच्या मताला घरात काहीएक महत्व राहिलेलं नसतं. घराचा त्याग करू, स्वत:ला सिद्ध करु आणि मगच परत येऊ असं त्यानं ठरवलेलं असतं. वाट फुटेल तिकडे तणतणत चालताना त्याला एका वाटेवर एक जोगी भेटतो. 'माघारी जा' असा संदेश तो जोगी देतो. संदेशासोबत एक विचित्र वस्तूदेखील. जोग्यावर विश्वास बसल्यानं ज्येष्ठ माणूस परत फिरतो. घरी आल्यावर त्याचं स्वागत भावाच्या अपशब्दांनी होतं. सततचा अपमान व अवहेलना सहन होईनाशी होते. विचार आणि कृतीत असणारा प्रचंड अंतर्विरोध ठायीठायी दिसू लागतो. हा अंतर्विरोध, हे अंतर्द्वंद्व जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असतं. ते, या कादंबरीत अतिशय परिणामकारकपणे दर्शवलं जातं.  विचारात सुसूत्रता नसणे, त्यातून घेतले गेलेले विचित्र निर्णय, त्यामुळे होणारे परिणाम, विचित्र कृतींमागे असणारे विचित्र अनुभवांचे भास, आहे एक, वाटतंय दुसरंच आणि होतंय तिसरंच अश्या स्वरुपांचे प्रसंग, ब्रिटिश पारतंत्र्याखाली असणारं कोकणातलं अगदी छोटं गाव, तिथं धर...