Posts

Showing posts from November, 2023

काळाची जन्मकथा*

Image
*काळाची जन्मकथा*   लेखक : स्टीफन हॉकिंग प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन मराठी अनुवाद : डॉ. सुभाष के. देसाई पृष्ठे- २२६, मूूल्य- ३०० रुपये शास्त्रज्ञ म्हणजे काय किंवा हे शास्त्रज्ञ म्हणवणारे लोक नेमकं करतात काय हेदेखील जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून ते आजतागायत मला दोन लोकांविषयी कमालीचं कुतूहल होतं, आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग. दोघांनीही आपापल्या देशांत राहून जागतिक संशोधन क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. इतर क्षेत्रात मिळते तशी लोकप्रियता शक्यतो शास्त्रज्ञांच्या वाट्याला येत नाही कारण त्यांचं काम नेहमीच पडद्यामागे राहून अविरतपणे चाललेलं असतं. माणसाचे वयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुखकर करणाऱ्या अशा हजारो गोष्टी पडद्यामागे अपार मेहनत करून "शास्त्रज्ञ" बनवत असतात पण लोकप्रियता ही नेहमी त्यांच्यापासून चार हात दूरच राहते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग हे सध्याच्या घडीला याला अपवाद मानता येतील. एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्यादेखील वाट्याला येणार नाही अशी लोकप्रियता मिळवणारे हे दोन महान शास्त्रज्ञ! ...

उच्च शिक्षण धोरण :आव्हाने आणि दिशा

Image
उच्च शिक्षण धोरण :आव्हाने आणि दिशा      माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात. पण, त्याचबरोबर शिक्षण देखील मूलभूत गरजच आहे. आपला सामाजिक ,सांस्कृतिक, राजकीय ,आर्थिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. राज्यघटनेत देखील प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे असले पाहिजे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे .असे असताना सुद्धा किती मुलांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत मिळते ,त्याचा दर्जा काय असतो हे एक कोडेच आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फारच तुरळक आहे .ते शिक्षण घेत असताना अनेक समस्या आव्हाने समोर उभी असतात .ती आव्हाने कोणती आहेत ,त्याचे प्रश्न काय आहेत हे आपण नीट समजून घेतले पाहिजेत.      सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे नक्की काय आहे? त्या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार, महाविद्यालय, विद्यापीठे यांची यामध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे .विद्यार्थी, शिक्षक ,प्राध्यापक यांचे स्थान काय असेल ,विद्यार्थ्यांसाठी खरंच ती कितपत उपयुक्त आहे. त्यांच्यासमोर कोणती आव्हाने निर्माण होती...

तु माझा

४४.  तु माझा माझा तु आहेस म्हणून म्हणून तुझ्याशी मी भांडते ममातील काही दुःख मी तुझ्या पुढ्यात मांडते  हुंदका आवरताना माझा  आवाज कापरा होतो  कधी रागवते तर कधी उलट बोलुन तुला देत असते  तु धरला अबोला की मी  मनात कुढत असते  तुम्ही समजून घेत जा थोडेतरी प्रेम असुदे तुझेही मजवरी तुझ्यामुळेच ओळख  माझी तुझ्यामुळेच आपली जोडी नको  धरू अबोला रुसू नको  हळुच तिरकस रागाने बघू नको तुझ्याशिवाय अपूर्ण मी दुराव्याने तू वागू नको तू माझा मी रे तुझी  जोडी आपली जमली खाशी

झाड आणि माणूस*

Image
*झाड आणि माणूस* लेखक : निळू दामले मुखपृष्ठ : गोपी कुकडे प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे पृष्ठं : १०० किंमत : ९० रु. डोळ्यांला भूक लागणे काय असते, हे अनुभवण्यासाठी काही वेगळ्या वळणाची पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायची असते. त्यातून त्या पुस्तकाचं आगळेपण लक्षात येतं. ज्येष्ठ पत्रकार आणि समाजविश्लेषक निळू दामले यांच्या 'झाड आणि माणूस' या पुस्तकाकडे याच नजरेतून बघायला हवं. त्याच्या आस्वादातून जे एक निर्णायक आणि गोळीबंद मत हाताशी येतं, ते म्हणजे 'निसर्गाला मैत्र भावनेतून जवळ कसं आणता येतं' ते या पुस्तकात कळतं. रोजच्या जीवनातील फुलं-फळं, अन्न इत्यादी घटकांच्या विषयी एक वेगळी माहिती या पुस्तकातून कळते. आपल्या झाडाच्या मैत्रभावनेचं निळू दामले यांना कळलेलं महत्त्व सर्वदूर पसरलेल्या माणसाला सहज समजेल असं उतरलेलं आहे. झाडांच्या जन्मकथा, प्रत्येकाच्या मनात झाड कशा पद्धतीनं उगवत असतं आणि वाढतं त्यावर प्रत्येकाच्या मनाचं बैसणं असतं. झाड आणि माणूस ऋणानुबंधाची एक साखळी सूत्रबद्धतेने डोळ्यांसमोर येत जाते. त्यातून निर्माण होते ती सख्यभक्ती. झाड बघणं तसं नवं नसतं. त्यात प्रत्...

सुवर्ण गरुड* लेखक - मारुती चितमपल्ली

Image
*सुवर्ण गरुड*  लेखक - मारुती चितमपल्ली  साहित्य प्रसार केंद्र, नागपूर अरण्यऋषी म्हणून ओळख असलेले मराठी लेखक  मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले हे पुस्तक होय. वनाधिकारी म्हणून काम करत  असताना प्राण्यांसोबतच्या तसेच निसर्गाच्या सहवासातील अनेक अनुभवांवर  लिहिलेल्या कथांचा व घटनांचा हा संग्रह होय. यातील पहिल्याच कथेच्या  संदर्भाने पुस्तकाला "सुवर्ण गरुड" असे नाव देण्यात आलेले आहे. जंगलात  वावरणाऱ्या विविध प्राण्यांसोबत त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध  करण्यात आलेले आहेत. त्यातून विविध प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये प्रामुख्याने  समोर येतात. यातील अनेक वैशिष्ट्ये सर्वसामान्य वाचकाला कदाचित माहीत  नसतीलही. त्यामुळे प्राणीजीवन नव्याने अनुभवण्याची संधी या पुस्तकाद्वारे  मिळते. प्राण्यांचं वागणं-बोलणं व मनुष्यासोबत असलेला दृष्टिकोन हा पदोपदी  विविध कथांमधून जाणवत राहतो. सुवर्ण गरुडासोबतच, मुकना मोर, खंड्या पक्षी,  नाकेर पक्षी, शेकरू, कोल्हा, उंदीर, मुंगूस, सांभर, वाघीण, अजगर यासारख्या  विविध प्राण्यांच्या कथा या ...

चार नगरांतले माझे विश्व'*जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे

Image
*'चार नगरांतले माझे विश्व'* जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र   (मौज प्रकाशन) *या आत्मचरित्राला 2014 सालचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे . *नारळीकरांचे(लेखक) आयुष्य प्रामुख्याने बनारस-केंब्रिज-मुंबई-पुणे या 4 नगरात गेले . या नगरात त्यांना आलेलं अनुभव , त्याच्या आयुष्यात आलेली माणसे , त्याच्या सहवासामुळे लेखक कसे अनुभव संपन्न होते गेले याचे वाचनीय वर्णन ग्रंथात आहे . *लेखकानी सामान्य जनतेसाठी विविध मासिकात लेख , वैज्ञानिक ग्रंथ आदींचे लिखाण केले आहे .वाचकाला खिळवून ठेवणारी , एखादी वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणारी भाषाशैली याही ग्रंथात दिसून येते . खगोलसंशोधन व गुरुत्वाकर्षण सारखा अवघड समजला जाणार विषय त्यांनी ग्रंथात अति सोप्या भाषेत मांडला आहे . *या ग्रंथाची एक जमेची बाजू मला वाटली ती म्हणजे सकारात्मकता .संपूर्ण ग्रंथात कुठेही टीका टिप्पणी नाही , बडेजाव नाही .काही ठिकाणी सुधारणा सुचवायची असेल तर तशी योग्य ती मांडणी केली आहे . *हे आत्मचरित्रा सह  प्रवासवर्णन आहे कि काय असे वाटत राहते. संशोधन कार्य तसेच कौटुंबिक पर्यटन साठी लेखक विविध दे...

गणिती*

Image
*गणिती* लेखक - अच्युत  गोडबोले  आणि डॉ. माधवी ठाकुरदेसाई  प्रकाशक  - मनोविकास प्रकाशन पाने  - 470 किंमत  - 270रुपये मित्रांनो,नुकतेच माझ्या आवडत्या लेखकाचे  म्हणजेच अच्युत गोडबोले याचे गणिती हे अप्रतिम पुस्तक वाचून झाले. यापूर्वी गोडबोले यांचे किमयागार, मुसाफीर, मनात, झपूर्झा भाग 1,2,3,  गुलाम, बोर्डरूम, अर्थात  हे पुस्तके वाचून झालेली. ग्रंथालयात #गणिती हे पुस्तक बऱ्याचदा नजरेस पडले होते पण लहानपणापासुनच मला गणिताची तशी भितीच होती म्हणून ह्या पुस्तकाकडे त्याच्या नावावरून कधी लक्षच दिले नाही. पण माझ्या एका मित्रानेहे पुस्तक वाचले होते आणि मला या पुस्तकाबद्द्ल सांगितले त्यामुळे थोडे धाडस करून हे पुस्तक वाचायला घेतलेच. यात काही समजेल कि नाही याबद्द्ल जरा साशंक होतोच पण जेव्हा प्रस्तावना वाचायला लागलो (मला लेखकाच्या प्रस्तावना खूपच आवडतात त्यामुळे पुस्तक वाचण्याचा उत्साह अधिकच वाढतो ) तसा तसा पुस्तकाबद्द्ल फारच कुतुहल निर्माण झाले. पण जसे जसे वाचत गेलो तसे तसे मला खूपच रंजक वाटले. तुम्हीही या गणिताच्या मैफिलीचा आस्वाद एकदा तरी घ्यावा...

किमयागार.*

Image
*किमयागार.* लेखक- अच्युत गोडबोले. प्रकाशक- राजहंस प्रकाशन. प्रथमावृत्ती- जून 2007. नवी आवृत्ती- डिसेंबर 2016 (सहावी). पृष्ठसंख्या- 540. किंमत- रु.४५०. हे पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या विज्ञान प्रेमाचा एक सुंदर अविष्कार आहे. हे पुस्तक सुरु करताना मी जेव्हा प्रास्ताविक वाचत होतो एकदम भारवून गेलो. या प्रास्ताविकामध्ये गोडबोलेंनी या पुस्तक लिहिण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे यामध्ये त्यांनी आपले लहानपणाचे काही अनुभव सांगितले आहे. परमेश्वर, देवपूजा, व्रतवैकल्ये या संकल्पना, पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरा आणि त्यामागे असणारी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं मार्मिक विश्लेषण त्यांनी इथे केलेलं आहे. सत्यनारायणाच्या पुजेमागचे गौडबंगाल कळल्यानंतरचा परमेश्वरापासून दूर जाण्याचा त्यांचा प्रवास आणि विज्ञानाला तितकेच जवळ झाल्याचे जाण्याचे दिवस या सर्वांवर सुरेख विवेचन त्यांनी केलेलत आहे. या पुस्तकामध्ये मुख्यत्वे करून दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये भौतिकशास्त्र व त्याच्याशी संबंधित विख्यात शास्त्रज्ञ यांची माहिती आहे र दुसर्‍या भागामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पृथ्वी विज्ञान यासंदर्भात...

लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा*

Image
*'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा* भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्‍या आणि शिकवणार्‍यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्‍या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठ...

पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'

Image
पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया' पु. ल. देशपांडे 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल असं म्हणाले होते: गेल्या कित्येक वर्षांत अशी हसविणारी आणि तितकीच अस्वस्थ, अंतर्मुख करणारी कादंबरी मी वाचली नव्हती. 'मेड इन इंडिया'तील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व 'शॉर्टकट' आहे. आजच्या सुशिक्षित तरुणाची नेमकी शोकांतिका आणि विदारक कोंडी या कादंबरीतून अतिशय प्रगल्भपणे मांडली गेली आहे. वऱ्हाडी बोलीबरोबरच काव्यात्म, वृत्तपत्रीय, राजकीय आणि चिंतनशील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर या लेखनात अतिशय खुबीने केला गेला आहे. बोलीभाषा, ग्रांथिक मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणातून लेखकाने एक वेगळीच भाषा निर्मिली आहे. या रसायनाचा भाषातज्ज्ञांनी गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. कारण ही नव्या पिढीची भाषा आहे. आधुनिक ग्रामीण-शहरी जीवनाचे एवढ्या समर्थपणे केलेले चित्रण मराठीत दुसरे नाही. मराठीत 'मैलाचा दगड' ठरावी अशी ताकद या कादंबरीत आहे. या कादंबरीने मला खूप हसविले आणि तितकेच डोळ्यांत पाणी यावे असे अस्वस्थही केले. मी मनात जपलेल्या मोजक्या पुस्तकांपैक...

झिम पोरी झिम

Image
बाईपणातून जाणाऱ्या बाईचा प्रवास: झिम पोरी झिम   बालाजी मदन इंगळे यांची 'झिम पोरी झिम' ही पहिलीचकादंबरी. यापूर्वी त्यांचा 'मातरं' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहाने त्यांना ग्रामीण कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांच्या काही कवितांमधून स्त्रीचे भावविश्व साकारले आहे. ग्रामीण स्त्रीचे समग्र भावजीवन त्यांना नेहमीच खुणावत असावे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी कादंबरी हा जास्त अवकाश असणारा वाङ्मयप्रकार जाणीवपूर्वक निवडलेला दिसतो.        या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र असलेल्या जनीचे प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला सरळ तिच्या गावात, तिच्या घरी नेऊन सोडते. जनी ही कुठल्याही खेड्यातली, कुठल्याही सामान्य कुटुंबातली एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या जीवनातल्या वरवर सामान्य वाटणार्‍या गोष्टी सांगत एक असामान्य अनुभव देते. मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिचे त्या घरातले दुय्यम स्थान तिला शंकर या तिच्या भावाच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवते. तिच्या जन्माच्या वेळी 'दुसऱ्या वेळीही मुलगीच झाली' हा मायबापाचा असंतोष तिच्या वाट्याला आलेला असतो. मात्र जनी आजारी पडते तेव्ह...

ऑलिम्पिक मेडलचा रोमांचक प्रवास (खाशाबा जाधव)

Image
ऑलिम्पिक मेडलचा रोमांचक प्रवास स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती. अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव...पैकी ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडादिवस म्हणून साजरा करतो. पण मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात त्यांनी कांस्य जिंकलं होतं. ऑलिम्पिक मेडलचा रोमांचक प्रवास आज खाशाबा जाधव हे भारतीय क्रीडा क्षेत्रात एक चालती बोलती दंतकथा आहेत. पण, त्यांनी मेडल कसं जिंकलं ही कहाणी अगदीच रोमांचक आहे. जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव' या नावाचं पुस्त...

सुलभ मराठी व्याकरण

Image
सुलभ  मराठी व्याकरण अलीकडे शालेय जीवनापासूनच नवनव्या भाषा शिकण्याकडे कल दिसून येतो. त्या जरुर शिकाव्यातच; पण मातृभाषेचे काय? आपल्याच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल! मराठीचे व्याकरण, शुद्धलेखन चांगले समजले, तरच अन्य भाषा आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करू.  सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील ‘शब्दसिद्धी’ या महत्त्वाच्या प्रकरणातून जास्तीत जास्त तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय शब्द (मुख्यतः फारसी व अरबी) विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. मो. रा. वाळिंबे यांचे हे गाजलेले पुस्तक व्याकरण व लेखनाच्या सर्व विभागांवर अद्ययावत माहिती देते.  माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीपूर्व,पदविका आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.  उदाहरणे व अभ्यास याकरिता. मराठीचे सखोल ज्ञान हवे असणाऱ्या साऱ्यांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे. मो .रा . वाळिंबे म्हणजेच – मोरेश्वर रामचंद्र वाळिंबे . मराठी व्याकरणाच्या अध्यापनावर प्रभुत्व असलेले व्याकरणकार मोरेश्वर रामचंद्र वाळबे यांनी ३६ वर्षे माध्यमिक शाळेमध्ये व्याकरणाचे अध्यापन केले. मरा...

महाकवी कालिदास कथा

Image
महाकवी कालिदास  कथा संस्कृत भाषेबद्दल ज्यांना थोडीशीही माहिती आहे त्या प्रत्येकाने "कालिदास", "मेघदूत" हे शब्द निश्चितच ऐकलेले असतील. कालिदास हा संस्कृत भाषेतील सर्वांत लोकप्रिय कवी. इतका लोकप्रिय की त्याचा उल्लेख आदराने "कविकुलगुरु" असा केला जातो. त्याची नाटके आणि काव्ये फक्त भारतीयच नाहीत तर जगभरातील काव्यरसिक वाखाणतात. जर्मन भाषेतील महान कवी गटे याला देखील कालिदासाच्या काव्याने वेड लावले होते. आमच्या शाळेतल्या संस्कृतच्या बाई सांगायच्या की म्हणे कालिदासाचे "शाकुंतल" डोक्यावर घेऊन तो अक्षरशः नाचला होता. कालिदासाच्या "मेघदूत" या काव्यातील "आषाढस्य प्रथमे दिवसे.."; अर्थात "आषाढाच्या पहिल्या दिवशी..." या काव्यपंक्ती अजरामर आहेत. म्हणूनच या दिवसाला कलिदास दिन म्हटलं जातं ज्यांना संस्कृत भाषा चांगली येते किंवा तिचा अभ्यास केला आहे अश्यांनी कालिदासाची नाटके, काव्ये थेट संस्कृतातूनच वाचली असतील. पण माझ्यासारख्या ज्यांना संस्कृतची केवळ तोंडओळख आहे;ज्याला कालिदासाच्या काव्याचा थेट संस्कृतातून आनंद घेणं शक्य नाही...

विंध्वस्त हो......!"

"विंध्वस्त हो......!" एका गावात एक मूर्ख राहात होता. त्याच्या शेळीचं नाव होतं "विध्वंसिनी." तो लाडाने तिला 'विध्वंस' म्हणून हाक मारायचा. नावाप्रमाणेच ही शेळी जिथं जाईल तिथं नाशच करून टाकायची. कुणाचं गवत खा, भाजी खा, फुलझाड खा, रोपं तिच्या तडाख्यातून वाचायचीच नाहीत. एके दिवशी ती चरायला म्हणून गेली अन् परतलीच नाही. त्या मूर्खाला तिच्या वाचून अन्नपाणी गोड लागेना. शेवटी तिच्या शोधासाठी तोही घराबाहेर पडला. "विध्वंस! विधवंस!!" अशा हाका मारीतचं तो कावराबावरा होवून या गावातून त्या गावात असा हिंडू लागला. ऐकणाऱ्यांना कळेना की, असा हा 'विध्वंस! विध्वंस!' जप का करतो आहे. खरं तर "शुभ बोल नाय रे!" असा जप करून हा माणूस स्वतःचाच नाश करवून घेणार. दुसरं काय! दमून तो मूर्ख एका घरापाशी आला. घरातून रडणे ऐकू येत होते. गळा काढून रडणे. कुंटुंब प्रमुखाचा मृत्यू ५. झाला होता अन् मुले, आई सगळे दुःखाने आक्रोश करीत होते. मूर्खाला आपल्या लाडक्या शेळीची आठवण झाली आणि तोही हुंदके देवू लागला. "विध्वंस! विध्वंस!" त्याचे आक्रांदन सुरू होते. त्याचं हे ओरडण...

आठवण कृष्णाची

आठवण कृष्णाची नीलकांती रावा । वाजवितो पावा। वृंदावनी धावा । राधिकेचा ॥ कुण्या झाडावर । कुण्या फ़ांदीवर । लपलेला पोर । यशोदेचा ॥ धावती पाखरे । सारी गाय गुरे । ऐकूनी बासरी । कृष्णापाठी ॥ सावरले तन । आवरेना मन । कसे संमोहन । नदीकाठी ॥ मागूनी येईल । ओढावया वेणी । हूरहूर मनी । किती वेळ ॥ घागर भराया । भिजवली काया । बिलगले पाया । मृगजळ ॥ सावळा मुरारी । गाठूनी दुपारी । उभा वाटेवरी । कैसा नाही ॥ घागर फ़ुटावी । बांगडी टिचावी । गालावर लाली । आली नाही ॥ सांगायाचे काही । बोलायाचे नाही । काळजाच्या डोही । काय चाले ॥ आठवण आली । भेट नाही झाली ।  पापणीचे तीर । पुन्हा ओले ॥    -- सौ. मनिषा राजन कडव

प्रिय मुख्याध्यापक

Image
शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त  "प्रिय मुख्याध्यापक"   आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात. आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात. उदहारणच द्यायचं झालं तर कॉमर्स शाखा असलेली मुलं शाळेत किंवा आर्ट्स शाखेचे विद्यार्थी बँकेत नोकरी करतात. म्हणजे मुलं आज शाळांमधून जे काही शिकत आहेत, त्या शिक्षणाचे त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे, शिक्षण अर्थपूर्ण करण्यासाठी त्यात काय बदल करावे लागतील, शिक्षणाचा मुलांच्या स्वातंत्र्याशी आणि देशाच्या हिताशी काही संबंध आहे का? शाळांनी त्यासाठी काय करायला हवं, शिक्षणाशी संबंधित छोटया पण महत्त्वाच्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो, असे अनेक प्रश्न आपल्या मनात डोकावतात. पण आपण त्याचा पुढे काहीही उपयोग करत नाही. केवळ विचार करतो आणि सोडून देतो. मात्र नेमक्या याच प्रश्नांकडे लेखक शंकर मुसाफिर यांनी ‘प्रिय मुख्याध्यापक’ या त्यांच्या पुस्तकातून लक्ष वेधले आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. प्रदीप गोटुस...

श्राद्धविधी का केले जातात.

श्राद्धविधी का केले जातात. गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आणि त्यानंतर सुरू होतो पितृ पंधरवडा. या पंधरा दिवसांत पितरांच्या नावे दानधर्म, श्राद्ध केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जवळपास सर्वच धर्मांमध्ये श्राद्ध विधीला महत्व आहे. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध केल्यास पितरांना शांती मिळते. पितरांच्या आशीर्वादामुळे वंशजांच्या जीवनातील अडचणी दूर होत असल्याने या पंधरवड्यास अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः महाराष्ट्रात तिथीनुसार श्राद्ध करण्याची प्रथा आहे. श्राद्धविधीमुळे केवळ पितर आणि वंशजांना समाधान मिळते एवढेच नव्हे तर यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. जाणून घेऊया काय आहेत ती. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. यास पितृपक्ष असेही म्हणतात. पितृपूजा ही धर्माच्या अनेक शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा आहे. मृत पितरांच्या संबंधीच्या विधिसमूहाला पितृपूजा असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व प्राचीन व अर्वाचीन देशांत थोडया फार फरकाने पितृपूजेचे अस्तित्व आढळते. श्रद्धेने केली जाणारी कोणतीही गोष्ट म्हणजे श्राद्ध, ही संकल्पना आपल्यापैकी किती...

वाचन आणि ‘प्रज्वलित मन’*--------------------------

*वाचन आणि ‘प्रज्वलित मन’* -------------------------- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून १५ ऑक्टोबर हा आता ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्की काय मिळू शकतं आणि वाचन केलं नाही तर आपण काय गमावू शकतो याचा यानिमित्त घेतलेला वेध... ---- आपण दूर कुठं तरी डोंगराच्या माथ्यावर, गर्द जंगलाच्या मध्यावर, नितळ पाण्याच्या लाटेवर, अनाघ्रात-अनवट वाटेवर, विलक्षण शांततेच्या कुशीत असावं; स्वत:च स्वत:मध्ये असण्याच्या या आगळ्या प्रवासाची अनुभूती घेत स्वत:मधल्या अजूनही न सापडलेल्या गोष्टींचा शोध घेत राहावं; एकाच वेळी बाह्य जगाशी हळूहळू संपर्क तोडत असताना, आतल्या संवादाची ऊर्मी वाढवत जावं... कुठे तरी ती तार झंकारावी आणि एका अलौकिक आनंदानं अंतर्मन लख्ख उजळून निघावं... खरं सांगू का? हे एक स्वप्न आहे, स्वप्न! हे असलं स्वप्न आपण कित्येकदा पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण प्रत्यक्षात आपल्या बाबतीत यातली एकही गोष्ट घडत नाही, हीच वस्तुस्थिती! रोजच्या ट्रॅफिक जॅममधून, प्रचाराच्या कर्ण्यांच्या कर्णकर्कश आवाजातून, सततच्या कलहाच्या उच्चरवातून जिथं आपला बाह्य आवाज आपल्याला ऐ...