Posts

Showing posts from November, 2022

मनासारखे झाले तर...*

कविता  *मनासारखे झाले तर...* मनासारखे झाले तर किती किती मजा येईल मनाला वाटेल ते सारे प्रत्यक्ष करता येईल  रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे आकाशी भरारी घेणार लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या जगाची सैर करणार माझ्या प्रिय चांदोमामाची  एकदा घेईल मी भेट तेजाचे रहस्य जाणण्या जाईल सुर्यापाशी थेट स्वप्नातल्या परीकडून मी जादूची छडी घेईल  ती गोलगोल फिरवून सर्व इच्छा पूर्ण करील 'मनासारखे झाले तर' कल्पनेने मी आनंदते  मनासारखे व्हावे अशी नेहमी आशा बाळगते   सौ.मनिषा राजन कडव

वीज

वीज कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते लख्ख प्रकाशामध्ये अवघे जगणे उज्ज्वल होते उजेडात त्या न्हाते माझ्या मनातला अंधार विचार पक्षी उडू पाहतो क्षितिजाच्याही पार आकाशाचे अंगण त्याला अपुरे अपुरे होते कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते धगधगणारा अग्निलोळ मी हृदयामध्ये घेते  धमन्यांमधून मग प्रवाही ऊर्जा धावत जाते मरगळलेली प्रतिभा तेव्हा पुन्हा तरारुन येते कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते जणु एखादी नदी कोरडी दुथडी भरून वाहे कवितेघरच्या श्रीमंतीची तऱ्हाच अद्भुत आहे तिच्या कृपेच्या वर्षावाने झोळी भरून जाते कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते त्याच विजेला करून घेते मीही मग आपलेसे लाख दिव्यांनी झगमगते हे घर माझे इवलेसे चंदेरी सोनेरी होते, नशीब उजळुन निघते कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते  लख्ख प्रकाशामध्ये अवघे जगणे उज्ज्वल होते ! सौ.मनिषा राजन कडव.

वचनाची आठवण

वचनाची आठवण हा लेख वाचताना नक्कीच होते. शिक्षकांचे बालकांच्या जीवनातील महत्त्व सांगताना लेखक एक अत्यंत सुंदर वाक्य पेरतात, ‘खरेतर बालकाच्या आयुष्यात येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना बालक निश्चित करू शकत नाहीत. मात्र त्याच्या आयुष्यातील शिक्षक निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या पालकांना मात्र निश्चित असते…’ असे सांगताना लेखक शिक्षकाला थेट परीसाची उपमा देतात. अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अधिवेशन नांदेड येथे सुरु असताना एका शिक्षकाचा सत्कार उच्च शिक्षित अधिकारी करतात आणि पटकन त्या शिक्षकाचा पदस्पर्श करतात. उपस्थित लोक आश्चर्याने ती घटना पाहतात. नंतर समजते की, ते शिक्षक त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे शिक्षक होते. शिक्षकाबद्दलची अशी व्यासपीठावर व्यक्त झालेली कृतज्ञता ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मौलिक आहे. एकंदरीत ‘शिक्षणाचे पसायदान’ हा ग्रंथ वाचनीय, मार्गदर्शन करणारा, मौलिक असा आहे. अत्यंत सोप्या भाषेत अनेकानेक अत्यंत चांगले विचार, सिद्धांत मांडले आहेत. लेखकाचा अभ्यास आणि शिक्षण क्षेत्रासाठीची त्यांची तळमळ जाणवल्याशिवाय राहत नाही. आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची हातोटी अवर्णनीय अशीच आहे. त्यांच्या ...

भेट

भेट......  भेट तुझी-माझी  प्रलंबित - विलंबीत,  दोघांनाही अनपेक्षीत, सोज्वळ तरी साग्रसंगीत,  भेट तुझी-माझी... तुझा परिचय देणारी, पहिल्याच भेटीत, तुझ्याबद्दल 'विश्वास'देणारी,  भेट तुझी-माझी.... तसे पहायला गेले तर , भेटी बऱ्याच होतात, काळजावर 'एकमेव' कोरलेली  भेट तुझी-माझी ..... नियतिने निश्चित केलेली, तुझ्या-माझ्याही नकळत, आपल्याला नजदीक आणणारी  भेट तुझी-माझी....  सौ.मनिषा राजन कडव.

चाहूल मृत्युची

*चाहूल मृत्यूची* रात्रीच्या वेळी लागे चाहूल दूर कोणाची करकरत्या दारावरती थडथडा थाप मृत्यूची वाहते मनातुन भीती, शंका वाटे सगळ्याची पालखी चालली वाटे भयकारक अशुभ कुणाची अंगणात पाउल वाजे चुरचुरे शुष्क पाचोळा सळसळता पिंपळ गाजे, पोटात उठे मग गोळा हृदयात धडधडे भारी पाहून भयाच्या खेळा भीतीने होतो वाटे हृदयाचा चोळामोळा खळखळते पाणी कोठे, कोठे सळसळ सर्पाची खदखदती हसते आहे सावली इथे अशुभाची वाजतात दातावरती कटकटा दात कवटीचे आवाज घशातुन निघती खरखरते गुदमरल्याचे हाकामारीच्या हाका मृत्यूला म्हणती ये रे चिरफळ्या होत डोक्याच्या, ये घोंगावत मग वारे दूरचे रान भरलेले घुबडांच्या घुत्काराने चांदणे वाटते आहे भरलेले पूर्ण विषाने या असल्या अर्ध्या रात्री डोळ्यावर झापड येते चाहूल लागता हलकी का मनात भीती भरते ही रात्र खुणा सांगतसे सैतानी अस्तित्वाच्या ना याव्या असल्या रात्री जगण्यामध्ये कोणाच्या सौ.मनिषा राजन कडव.

नात्यांचे रंग

*नात्यांचे रंग* नाती असतात स्वच्छंद फुलपाखरासारखी... आयुष्य रंगी-बेरंगी करणारी... नाती असतात खळखळनार्या झर्यासारखी... थेंब थेंबात सुख-दुखाचे मोती वेचणारी... काही नाती असतात मधाळ गोडवा घेऊन येणारी... तर काही कारल्यालाहि कडूपणा शिकवणारी... पण जितकी मुरतील तितकाच जास्त आनंद देणारी... काही नाती असतात अगदी खळखळून हसवणारी... आणि काही तितकंच रडवणारी... हसता रडता आपल्याला प्रत्येक क्षणी सावरणारी... काही नाती अगदी बाल कृष्णासारखी खट्याळ.. तर काहींमध्ये साचलेला नुसता शिष्टपणाचा गाळ.. पण इतक्या भिन्नतेतहि असते एकत्र बांधलेली नाळ... काही नाती मनात खोल घरट करून बसतात... काही मात्र आभाळभर भरकटलेलीच असतात...सांजवेळी सगळी पुन्हा मनात एकत्र  येऊन निजतात... काही नाती मनाशी अगदी घट्ट बांधलेली... तर काही अगदी सहजच सुटत गेलेली.... सगळ्यांनी मिळून मायेची उब देणारी गोधडी विणलेली... काही नाती मस्त गोंडस नावानी सजलेली... तर काही नाव नसूनही.. गूढ अर्थ दडलेली... मनाच्या जमिनीत सगळीच खोलवर रुजलेली.... काही नाती असतात आयुष्यभर साथ देणारी... तर काही क्षणभराची पण कायम लक्षात राहणारी... क्षण क्षण गोळा करून बांधले...

महिलांचे स्थान

महिलांचे देशाच्या विकासातील स्थान.   भारतात राहून, भारतीय असून भारताला नेहमीच रूढीवादी व स्त्रियांना शिक्षण व प्रगतीपासून दूर ठेवणारा अशा पद्धतीची प्रतिमा भारताची तयार करणारे लोक या गोष्टीचा कधीही विचार करीत नाहीत व भारतीय महिलांची जागतिक स्तरावर महिलांशी तुलनाही करीत नाही. ज्या देशांचा उगम जेमतेम 400-500 वर्षांपूर्वी झालेला आहे, त्या देशांशी स्वत:ची तुलना हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या देशातील जनतेने करणे हे कितपत बरोबर आहे? जगाच्या इतिहासामध्ये ज्यांना प्राचीन असं संबोधलं गेलं आहे अशा अनेक सभ्यता व देश जगाच्या रंगमंचावरून केव्हा अदृश्य झाले ते कोणालाच माहिती नाही. आजचे प्रगतिशील देश व त्यांचे नागरिक ज्या वेळेला अस्तित्वात नव्हते किंवा जंगलामध्ये लज्जा रक्षणासाठी झाडाची पाने गुंडाळून राहात होते, त्याच काळामध्ये किंवा त्यापेक्षाही आधी भारतामध्ये गार्गी आणि मैत्रेयीसार‘या महान विदुषी होऊन गेल्या आहेत. ज्या काळामध्ये महिला शिक्षणासाठी घराबाहेर म्हणजे शाळेत जात नव्हत्या, त्या काळामध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने महिलांची फौज उभी केली. ही किती मोठी गोष्ट होती? परंतु, याचा भारतातील कित...

अमृतमहोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.... देश साजरा करतोय स्वातंत्र्याचा उत्सव... ७५ व्या वर्षी आहे स्वातंत्र्याचा महोत्सव.... देशातील नागरीक अजुन व्हावे ज्ञानी.... जे जाणेल लोकशाहीची वाणी... धर्म, जाती, पंथ, भाषा विसरुन येवू एकत्र सर्व.. आनंदाने सुरू करुया अमृत महोत्सवाचे नवे पर्व.. शेतकरी, कामकरी, सैनिकांना देवूनी मान... त्यांच्या कामाचा देशालाही असावा अभिमान.. पारतंत्र्याचे डोंगर गेले निघून दूरवरी.. आता तिरंगा फडकणार देशातील प्रत्येक छतावरी... एक दिवस नव्हे तर रोज ठेवूनी ध्यानी.. अमृत महोत्सव साजरा करुया  स्वातंत्र्याचा आपण सर्वांनी.... - सौ. मनिषा राजन कडव

आरसा

आरसा  तुझे माझे असे कधी , नाही करत आरसा । मनी भाव तसे रूप , दाखवितो आरसा ।।  कुणी उभे पुढे जरी , सत्य बोले आरसा । पोटी एक ओठी दुजे , दावितसे आरसा ।। भले बुरे उणे काय , सांगतसे आरसा । दोष नको जाण गुण , बोलतसे आरसा ।।  झाले कसे घाव मनी , शोधतसे आरसा । चित्त जाळी देह कसा , जाणतसे आरसा ।। सत्य मुळी सोडु नको , बजावतो आरसा । खोटे अंगी बाणु नको , बोधतसे आरसा ।।  बाल युवा वृद्ध सारे , पाहतोच आरसा । काल जसा तसा नाही , टोकतसे आरसा ।। आले किती गेले किती , तिथेच आहे आरसा । जीव नाही तरी भाव , जाणतोच आरसा ।। स्वर्गी गेले प्रिय किती , पाणावतो आरसा । मोक्ष मला मिळे कधी , विचारतो आरसा ।।  सौ.मनिषा राजन कडव.

नात्यांचे रंग

*नात्यांचे रंग* नाती असतात स्वच्छंद फुलपाखरासारखी... आयुष्य रंगी-बेरंगी करणारी... नाती असतात खळखळनार्या झर्यासारखी... थेंब थेंबात सुख-दुखाचे मोती वेचणारी... काही नाती असतात मधाळ गोडवा घेऊन येणारी... तर काही कारल्यालाहि कडूपणा शिकवणारी... पण जितकी मुरतील तितकाच जास्त आनंद देणारी... काही नाती असतात अगदी खळखळून हसवणारी... आणि काही तितकंच रडवणारी... हसता रडता आपल्याला प्रत्येक क्षणी सावरणारी... काही नाती अगदी बाल कृष्णासारखी खट्याळ.. तर काहींमध्ये साचलेला नुसता शिष्टपणाचा गाळ.. पण इतक्या भिन्नतेतहि असते एकत्र बांधलेली नाळ... काही नाती मनात खोल घरट करून बसतात... काही मात्र आभाळभर भरकटलेलीच असतात...सांजवेळी सगळी पुन्हा मनात एकत्र  येऊन निजतात... काही नाती मनाशी अगदी घट्ट बांधलेली... तर काही अगदी सहजच सुटत गेलेली.... सगळ्यांनी मिळून मायेची उब देणारी गोधडी विणलेली... काही नाती मस्त गोंडस नावानी सजलेली... तर काही नाव नसूनही.. गूढ अर्थ दडलेली... मनाच्या जमिनीत सगळीच खोलवर रुजलेली.... काही नाती असतात आयुष्यभर साथ देणारी... तर काही क्षणभराची पण कायम लक्षात राहणारी... क्षण क्षण गोळा करून बांधले...

चाहूल मृत्युची

*चाहूल मृत्यूची* रात्रीच्या वेळी लागे चाहूल दूर कोणाची करकरत्या दारावरती थडथडा थाप मृत्यूची वाहते मनातुन भीती, शंका वाटे सगळ्याची पालखी चालली वाटे भयकारक अशुभ कुणाची अंगणात पाउल वाजे चुरचुरे शुष्क पाचोळा सळसळता पिंपळ गाजे, पोटात उठे मग गोळा हृदयात धडधडे भारी पाहून भयाच्या खेळा भीतीने होतो वाटे हृदयाचा चोळामोळा खळखळते पाणी कोठे, कोठे सळसळ सर्पाची खदखदती हसते आहे सावली इथे अशुभाची वाजतात दातावरती कटकटा दात कवटीचे आवाज घशातुन निघती खरखरते गुदमरल्याचे हाकामारीच्या हाका मृत्यूला म्हणती ये रे चिरफळ्या होत डोक्याच्या, ये घोंगावत मग वारे दूरचे रान भरलेले घुबडांच्या घुत्काराने चांदणे वाटते आहे भरलेले पूर्ण विषाने या असल्या अर्ध्या रात्री डोळ्यावर झापड येते चाहूल लागता हलकी का मनात भीती भरते ही रात्र खुणा सांगतसे सैतानी अस्तित्वाच्या ना याव्या असल्या रात्री जगण्यामध्ये कोणाच्या सौ.मनिषा राजन कडव.

मनीमाऊ

मनीमाऊ मनी माऊ मनी माऊ तू दिसते किती छान मोठ्ठाले डोळे तुझे टवकारलेले कान सदानकदा कशी तु माऊ माऊ करते घोटाळत असते सगळ्यान भोवती कधीही ना तु दमते वाघाची मावशी तु तूझा राजेशाही थाट मोतीशी भांडताना बोचकारते तु त्याला खास माश्याचा वास येता गपचूप गाठते स्वयंपाकघर डोळे मिटून दूध पिताना तूला  आजूबाजूचे नाही दिसत उंदीर मामांची घरातील तर बोलतीच झालीय बंद आई तुझी खुशामत करत म्हणते मनी आहे  आमची अकलमंद सौ. मनिषा राजन कडव

गांधी का मरत नाही

गांधी का मरत नाही ?' चौकटीत न मावणारा गांधी समजून घेतांना.... दोन ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या साजरे करण्यात कार्यालयीन, शासकीय सोपस्काराचा गंध अधिक असतो. बाकी 'महात्मे' वेगवेगळ्या जातीने वाटून घेतले. ह्या इत जातीच्या चौकटीत म.गांधी बसू शकले नाही. कम्युनिस्ट, आंबेडकरी, आरएसएस हे वैचारिक टोक असलेल्या चळवळीतील अभ्यासकांनी, माणसांनी संघ गांधींना कधी जवळ केले नाही. अगदी गांधीवाद्यांनी गांधीना नीट समजून कर घेतलेलं दिसत नाही. तरीही शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील गांधीजींच्या बो फोटोची अपरिहार्यता टाळता आली नाही. विचार पुसता आले नाहीत. या देऊ पार्श्वभूमीवर अलीकडे रावसाहेब कसबे यांचे 'गांधी पराभूत राजकारणी 'आणि विजयी महात्मे' जगदीश कदम यांचे 'गांधी समजून घेतांना' ही वि पुस्तकं गांधी विचाराची नव्याने मांडणी करतात. ह्यात चंद्रकांत वानखडे लिखित 'गांधी का मरत नाही' हे पुस्तकही वेगळ्या मांडणीने लक्षात राहिलं. आरंभी पुस्तकाचे शीर्षक पाहून हा माणूस गांधींना मेल्यावरही मारायला का उठला ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करून गेला, प...

गांधी का मरत नाही

गांधी का मरत नाही ?' चौकटीत न मावणारा गांधी समजून घेतांना.... दोन ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या साजरे करण्यात कार्यालयीन, शासकीय सोपस्काराचा गंध अधिक असतो. बाकी 'महात्मे' वेगवेगळ्या जातीने वाटून घेतले. ह्या इत जातीच्या चौकटीत म.गांधी बसू शकले नाही. कम्युनिस्ट, आंबेडकरी, आरएसएस हे वैचारिक टोक असलेल्या चळवळीतील अभ्यासकांनी, माणसांनी संघ गांधींना कधी जवळ केले नाही. अगदी गांधीवाद्यांनी गांधीना नीट समजून कर घेतलेलं दिसत नाही. तरीही शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील गांधीजींच्या बो फोटोची अपरिहार्यता टाळता आली नाही. विचार पुसता आले नाहीत. या देऊ पार्श्वभूमीवर अलीकडे रावसाहेब कसबे यांचे 'गांधी पराभूत राजकारणी 'आणि विजयी महात्मे' जगदीश कदम यांचे 'गांधी समजून घेतांना' ही वि पुस्तकं गांधी विचाराची नव्याने मांडणी करतात. ह्यात चंद्रकांत वानखडे लिखित 'गांधी का मरत नाही' हे पुस्तकही वेगळ्या मांडणीने लक्षात राहिलं. आरंभी पुस्तकाचे शीर्षक पाहून हा माणूस गांधींना मेल्यावरही मारायला का उठला ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करून गेला, प...
|| *पहाट*॥ झुंजुर मुंजुर पहाट पक्ष्यांचा किलबिलाट, सोनेरी किरणांनी उजळे प्रकाशाची वाट......... धुक्याची दुलई मंद पहाटवारा, अंगा शिरशिरे धुंद गारवा बोचरा......... नभी घननिळ्या बगळ्यांच्या माळा, डोंगराआडचा सूर्य करे डोळा किलकिला......... दवबिंदूचे शिंपण दारी प्राजक्ताचा सडा, परसाच्या रानामागे घमघमला केवडा......... नव्या स्वप्नांची रोज नवीन पहाट, चैतन्याच्या उत्साहाने भारलेली जगरहाट......... सौ.मनिषा राजन कडव
*केळीचे झाड आणि स्त्री* केळीचे झाड किती लहान मूर्ती लहान कीर्ती महान केळीचे पान दिसते छान जैसे हलती हत्तीचे कान छोट्यामोठ्या थोरा सान हिरव्या पत्री अमृत पान केळीचे खोड हत्तीचे पाय उपयोग सांगू कित्ती काय? चटया दोर जेवणाचे ताट विघटन होण्या वेगळी वाट पिशव्या रंगीत पर्सचा थाट ऐटीत करू बाजार हाट पौष्टिक स्वस्त केळी मस्त ऊर्जा झटपट करूया फस्त फुलांची भाजी करते आजी गरम खावी ताजी ताजी केळीच्या या उपकार केवढे आईच्या थोर उपकारा एवढे नमस्कार करू केळीला बाळा देह त्याचा उपयोगी सगळा सौ.मनिषा राजन कडव.
सात्विक संताप   मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा , गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... । डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन  .... तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... । विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा  .... त्याचे भय न्यारे , तुवा  गाभारा गाठावा ...| उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा .... कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा  .... । तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ... तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....| चराचरी व्यापलेला असशी म्हणती ... नित्य  येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....| अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा .... सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....| लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ... सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी .... अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी वाटे मला , कस तुझा पणाला लागावा  .... । प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ... निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे .... माणसाला दिले मन बुद्धी ,  तू तोकडे .... माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... । कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी .... कोटी कोटी मनातून का न तू...
*बरसल्या श्रावणधारा* (कविता ) खिडकीतून वेध घेत  मन फुलपाखराप्रमाणे बागडत  धावत.........सुसाट पळत  उंच उंच गरुडझेप घेत  अशा बरसल्या श्रावणधारा ||१|| रंगबिरंगी पक्षी...प्राणी  माना डोलत आनंदाने नाचतच  रेशीम सरींना स्पर्श करीत  धुंदावणारे मन देखील  थुई थुई नाचणाऱ्या मोराप्रमाणे  नृत्य करू लागताच  अशा बरसल्या श्रावणधारा ||२|| इटुकल्या पिटुकल्या बालमित्रांची  साचलेल्या पाण्यात डुबक्या घेत  तरुण मन देहभान विसरून  ओल्या चिंब भावनेने शहारत कुणा आपल्या माणसाची  स्मृती आठवत  धुंदपणे धुंदावून ओल्या पापणीत साचवत  अशा बरसल्या श्रावणधारा ||३|| खटयाळ वारा जरा छेडतच  पाना-वेलींच्या कानी कुजबुजत बेभानपणे साऱ्या सृष्टीला हलवत  स्वतः मात्र बेहोशीत डोलत  भुलवी सारा पसारा  अशा बरसल्या श्रावणधारा ||४|| फुलांचे गंध  मादकपणे शोषून  तृप्तपणे मिटून... सुखावून....  बेधुंद सुगंधाची लयलूट करून  ओल्या गारव्याशी हितगुज करीत  शहारणाऱ्या मातीला अधिकच वेडावून अशा बरसल्या श्रावणधारा ||५|| धरतीवर जण...

सावली

सावली सारखी सदा मागे राहीन तूझ्या तूला कधीच पडू देणार नाही! तूझ्यासाठी लढेन जगाशी सदा पण तूला कधीच रडू देणार नाही! सौ. मनिषा राजन कडव

भेट

भेट......  भेट तुझी-माझी  प्रलंबित - विलंबीत,  दोघांनाही अनपेक्षीत, सोज्वळ तरी साग्रसंगीत,  भेट तुझी-माझी... तुझा परिचय देणारी, पहिल्याच भेटीत, तुझ्याबद्दल 'विश्वास'देणारी,  भेट तुझी-माझी.... तसे पहायला गेले तर , भेटी बऱ्याच होतात, काळजावर 'एकमेव' कोरलेली  भेट तुझी-माझी ..... नियतिने निश्चित केलेली, तुझ्या-माझ्याही नकळत, आपल्याला नजदीक आणणारी  भेट तुझी-माझी....  सौ.मनिषा राजन कडव.